spot_img
अहमदनगर'आलमगीर' परिसरात हळहळ! दोघे मित्र घराबाहेर गेले पण परतलेच नाही? घडलं असं...

‘आलमगीर’ परिसरात हळहळ! दोघे मित्र घराबाहेर गेले पण परतलेच नाही? घडलं असं काही…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजमत जावेद शेख (वय 13 रा. आलमगीर, नागरदेवळे) व मोहम्मद साद अन्सारी (वय 16 रा. सदर बाजार, गरीब नवाज बेकरी जवळ, भिंगार) अशी मयत अल्पवयीन मुलांची नावे आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागरदेवळे (ता. नगर) शिवारातील ब्रम्हतळे, आलमगीर येथील अजमत शेख व मोहम्मद अन्सारी हे दोघे मित्र ब्रम्हतळे, आलमगीर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही त्यात बुडाले. दरम्यान, जवळच आर्मीच्या सैनिकांचा कॅम्प सुरू होता. त्या कॅम्पसाठी उपस्थित असलेल्या सैनिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने तलावाजवळ धाव घेत त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढले व मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आलमगीर’ परिसरात हळहळ!
नागरदेवळे (ता. नगर) शिवारातील ब्रम्हतळे, आलमगीर येथील दोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती समजल्यानंतर आलमगीर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघांच्या मृतदेहाचे सायंकाळी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार एम. टी. विधाते करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...