spot_img
अहमदनगर'आलमगीर' परिसरात हळहळ! दोघे मित्र घराबाहेर गेले पण परतलेच नाही? घडलं असं...

‘आलमगीर’ परिसरात हळहळ! दोघे मित्र घराबाहेर गेले पण परतलेच नाही? घडलं असं काही…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजमत जावेद शेख (वय 13 रा. आलमगीर, नागरदेवळे) व मोहम्मद साद अन्सारी (वय 16 रा. सदर बाजार, गरीब नवाज बेकरी जवळ, भिंगार) अशी मयत अल्पवयीन मुलांची नावे आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागरदेवळे (ता. नगर) शिवारातील ब्रम्हतळे, आलमगीर येथील अजमत शेख व मोहम्मद अन्सारी हे दोघे मित्र ब्रम्हतळे, आलमगीर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही त्यात बुडाले. दरम्यान, जवळच आर्मीच्या सैनिकांचा कॅम्प सुरू होता. त्या कॅम्पसाठी उपस्थित असलेल्या सैनिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने तलावाजवळ धाव घेत त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढले व मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आलमगीर’ परिसरात हळहळ!
नागरदेवळे (ता. नगर) शिवारातील ब्रम्हतळे, आलमगीर येथील दोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती समजल्यानंतर आलमगीर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघांच्या मृतदेहाचे सायंकाळी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार एम. टी. विधाते करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...