spot_img
महाराष्ट्रअजित पवार गटाने लोकसभेसाठी बारामतीसह मागितल्या 'या' ९ जागा, संभाव्य उमेदवारही समोर?...

अजित पवार गटाने लोकसभेसाठी बारामतीसह मागितल्या ‘या’ ९ जागा, संभाव्य उमेदवारही समोर? पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे आता राजकीय वातवरण देखील तापू लागले आहेत. महायुतीमध्ये अर्थात फडणवीस-पवार-शिंदे सरकारमध्ये जागा वाटपावरून रणकंदन सुरु झाले आहे. आता लोकसभेसाठी नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याचीच माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादीकडील सध्या असणाऱ्या चार जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागा त्यांनी मागितल्या आहेत. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून अजित पवार गट धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया, छत्रपती संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रही असल्याचे समजते.

रायगड लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून सुनिल तटकरे यांचे नाव समोर येत आहे. या जागेवर भाजपने सुद्धा दावा केला आहे.

संभाव्य उमेदवारांची नावे
बारामती – सुनेत्रा पवार
सातारा – रामराजे नाईक निंबाळकर
रायगड – सुनिल तटकरे
शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील
दक्षिण मुंबई – काँग्रेसमधील बडा चेहरा
परभणी- राजेश विटेकर
भंडारा गोंदिया – प्रफुल्ल पटेल
धाराशिव – राणा जगजितसिंह
छत्रपती संभाजीनगर – सतीश चव्हाण

लोकसभेसाठी जय्यत तयारी
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी या सर्वानीच कंबर कसली आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तेच मागील काही दिवसांपासून अनेक भेटीगाठी देखील सुरु आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुलाच्या साक्षीने पित्याला लागली जन्मठेप; वाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीचा लाकडी दांड्याने निर्घृण...

आलमगीर शिवारात भयंकर प्रकार; जनावरे चारणाऱ्या महिलेसोबत घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर तालुक्यातील नागरदेवळे येथील आलमगीर शिवारात एका ४२ वर्षीय महिलेचा...

वन विभाग संभ्रमात; बिबट्याचा हल्ला आणि उंची यांचा काही संबंध असतो का?

नाशिक । नगर सहयाद्री:- बिबट्याचा वावर असलेल्या शहराजवळील लोहशिंगवे येथे शुक्रवारी सकाळी ३० वर्षाच्या...

दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचे महत्त्व अनमोल: आ. काशिनाथ दाते

२० लाख रुपयांचा पाडळी-कान्हुर रस्त्याचे भूमिपूजन पारनेर । नगर सहयाद्री:- रस्ते फक्त प्रवासाचे साधन नसून...