spot_img
अहमदनगरAhmednagar : नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बांधावर, दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Ahmednagar : नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बांधावर, दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील निघोज मंडळातील ज्या गावात गारपीटीमुळे नुकसान झाले आहे त्या गावातील जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था तातडीने करण्यात येईल. तसेच ज्या गावात अतीवृष्टी व गारपीट झाली त्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील अशी माहीती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

मंगळवारी सायंकाळी पारनेर तालुक्यातील पानोली, वडूले व सांगवी सुर्या या गावातील अतीवृष्टी व गारपीटग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसानीची पहाणी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केली. त्या वेळी ते शेतक-यांशी बोलत होते. या वेळी त्यांच्या समावेत प्रातांधिकारी गणेश राठोड, तहसीलदार गायत्री सैंदाणे, भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे, सुप्याचे माजी सरपंच दत्तात्रेय पवार, नायब तहसीलदार गणेश आढारी, सुभाष कदम, तसेच संजय मते, बी.ए.भगत, लहू भालेकर, पंकज कारखिले आदींसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थीत होते.

या वेळी जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेती पीके व फळबागांचे व कु्कुटपालनाचेही नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केली जातील.

थेट शेवटच्या शेतक-यापर्यंत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पंचनामे करण्यासाठी नेमलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनामे करताना कोणालाही वगळले जाणार नाही. तसेच अतीवृष्टीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थीत झाला आहे. त्यामुळे जनवरांसाठी तातडीने चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल असेही ते म्हणाले.

गारपीटग्रस्तांना तातडीने मदत द्यावी
पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी. तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे व आता रब्बीचीही पीके गारपीटीमुळे वाया गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने व जास्तीजास्त मदत मिळावी – राहुल शिंदे पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार संग्राम जगताप यांनी घेतला टीकाकारांचा समाचार; किंमत नसणाऱ्यांना… , काय म्हणाले पहा

चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अहिल्यानगर| नगर सह्याद्री मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे...

गुन्हेगारांना सोडणार नाही ; एसपी सोमनाथ घार्गे नेमकं काय म्हणाले पहा

अहिल्यानगर| नगर सह्याद्री जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. पोलिसांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज...

शेतकर्‍यांनो पेरणीची घाई करु नका ; कृषी विभागाने दिला रेड सिग्नल, काय म्हणाले पहा

आता निघणार घाम | १२ जूनपासून मान्सून सक्रीय होणार मुंबई | नगर सह्याद्री देशातील शेती आणि...

मुलाने आईवर केले कोयत्याने वार; पुढे घडले भयंकर…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - कौटुंबिक वादातून मुलाने आईवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना...