spot_img
राजकारणAhmednagar Politicas : आम्ही छोटी माणसं, आमचा नाद केला तर नाद पुरविल्याशिवाय...

Ahmednagar Politicas : आम्ही छोटी माणसं, आमचा नाद केला तर नाद पुरविल्याशिवाय राहणार नाही ! आ. राम शिंदे यांचा कुणाला इशारा ? पहा..

spot_img

श्रीरामपूर / नगर सह्याद्री :
Ahmednagar Political News : मी प्रामाणिक आहे. त्यामुळे मला पाच वर्षे पालकमंत्रीपद व आता पुन्हा आमदारकी मिळाली ती देखील सहा वर्षांसाठी.

जिल्ह्याच्या बाहेरील शक्ती जिल्ह्यात आणून मला पाडले, पडलो की पाडलं? ते माहीत नाही. मात्र तेव्हा सर्वांनी मजा पाहिली. आता आम्ही मजा पाहू. आम्ही छोटी माणसं असल्याने स्वतः कुणाच्या नादाला लागत नाही. पण आमचा नाद केला तर नाद पुरविल्याशिवाय राहणार नाही असं आ. प्रा. राम शिंदे यांनी म्हटले आहे. आता त्यांचा रोख कुणाकडे होता यावरून चर्चाना उधाण आले आहे.

ते श्रीरामपूर येथे आले असता ते बोलत होते. याच वेळी त्यांनी अहमदनगर दक्षिण मधून आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले. आपण सत्तेत असताना एक आणि सत्तेत नसताना एक असे बोटचेपे धोरण कधीच घेतले नाही.

सत्य बोलणे आणि वागणे हेच आपले भांडवल आहे.प्रामाणिकपणे सेवा करणार्‍याचे नशीब कोणीच हिराऊन घेऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पदांसाठी आपलं नाव पुढे असते. विधान परिषदेसाठी अनेक दिग्गज रांगेत असतानाही आपल्या निवडीने केलेले प्रामाणिक कार्य आणि विश्वास सिद्ध केला असेही ते म्हणाले.

जिल्हा विभाजनाबाबत बोलताना ते म्हणाले, जिल्हा विभाजनावर आपण आजही ठाम आहोत. जिल्हा विभाजन झाल्यातच जमा असून लवकरच ते होईल असे म्हणाले. परंतु या प्रश्नावर श्रीरामपूरचे पुढारी गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला. दरम्यान यावेळी श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीवर तुमचा निरोप मी वरपर्यंत पोहोचवतो असे आ. शिंदे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...