spot_img
राजकारणAhmednagar Politicas : आम्ही छोटी माणसं, आमचा नाद केला तर नाद पुरविल्याशिवाय...

Ahmednagar Politicas : आम्ही छोटी माणसं, आमचा नाद केला तर नाद पुरविल्याशिवाय राहणार नाही ! आ. राम शिंदे यांचा कुणाला इशारा ? पहा..

spot_img

श्रीरामपूर / नगर सह्याद्री :
Ahmednagar Political News : मी प्रामाणिक आहे. त्यामुळे मला पाच वर्षे पालकमंत्रीपद व आता पुन्हा आमदारकी मिळाली ती देखील सहा वर्षांसाठी.

जिल्ह्याच्या बाहेरील शक्ती जिल्ह्यात आणून मला पाडले, पडलो की पाडलं? ते माहीत नाही. मात्र तेव्हा सर्वांनी मजा पाहिली. आता आम्ही मजा पाहू. आम्ही छोटी माणसं असल्याने स्वतः कुणाच्या नादाला लागत नाही. पण आमचा नाद केला तर नाद पुरविल्याशिवाय राहणार नाही असं आ. प्रा. राम शिंदे यांनी म्हटले आहे. आता त्यांचा रोख कुणाकडे होता यावरून चर्चाना उधाण आले आहे.

ते श्रीरामपूर येथे आले असता ते बोलत होते. याच वेळी त्यांनी अहमदनगर दक्षिण मधून आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले. आपण सत्तेत असताना एक आणि सत्तेत नसताना एक असे बोटचेपे धोरण कधीच घेतले नाही.

सत्य बोलणे आणि वागणे हेच आपले भांडवल आहे.प्रामाणिकपणे सेवा करणार्‍याचे नशीब कोणीच हिराऊन घेऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पदांसाठी आपलं नाव पुढे असते. विधान परिषदेसाठी अनेक दिग्गज रांगेत असतानाही आपल्या निवडीने केलेले प्रामाणिक कार्य आणि विश्वास सिद्ध केला असेही ते म्हणाले.

जिल्हा विभाजनाबाबत बोलताना ते म्हणाले, जिल्हा विभाजनावर आपण आजही ठाम आहोत. जिल्हा विभाजन झाल्यातच जमा असून लवकरच ते होईल असे म्हणाले. परंतु या प्रश्नावर श्रीरामपूरचे पुढारी गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला. दरम्यान यावेळी श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीवर तुमचा निरोप मी वरपर्यंत पोहोचवतो असे आ. शिंदे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी २२ जानेवारी का आहे खास? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू...

खरे असणारे दीड किलो सोने बनावट कसे झाले?: बाबासाहेब तांबे

गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली! पारनेर...

शिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट…

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे...

27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक...