spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: खुशखबर! 'इतक्या' शेतकर्‍यांचा पीकविमा मंजूर

Ahmednagar News Today: खुशखबर! ‘इतक्या’ शेतकर्‍यांचा पीकविमा मंजूर

spot_img

पारनेर| नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील ३५ हजार ५२३ शेतकर्‍यांना सोयाबीन पीकविमा१६ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे. पारनेर तालुका कृषी अधिकार्‍यांना घेराव घालत विमा कंपनीला जाब विचारणार्‍या प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असुन पारनेर तालुक्यातील ३५ हजार ५२३ शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची अधिसूचना मान्य करत १६.०५ कोटी रुपये अग्रिम रक्कम विमा कंपनी मार्फत लवकरात लवकर वितरीत होणार असल्याची माहिती विश्वनाथ दादा कोरडे यांनी यावेळी दिली.

शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्ती, किड रोग यांसारख्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणार्‍या नुकसानीपासुन संरक्षण देण्यासाठी शासनाच्या वतीने १ रूपयात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पिकविमा योजनेची रक्कम तालुक्यात पडलेला पावसाचा खंड व अत्यल्प स्वरुपातील पाऊस यामुळे शेतकर्‍यांना मिळावी यासाठी कोरडे यांनी सातत्याने नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व दक्षिणेचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांसह विमा कंपनी, कृषी विभाग यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार केला होता. शेतकर्‍यांना सोबत घेऊन तालुका कृषी अधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या मांडून विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते.

विमा कंपनीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुणे येथील कार्यालयावर तालुक्यातील शेतकर्‍यांसह ठिय्या देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार मध्य हंगाम प्रतिकुल परिस्थिती अंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात आली असुन पारनेर तालुका व संगमनेर तालुक्यातील निमोण महसुल मंडळातील शेतकर्‍यांना अद्याप प्रलंबित असलेल्या सोयाबीन व मका पिकाच्या अग्रिम रकमेचे वाटप होणार असल्याचेही कोरडे यांनी यावेळी सांगितले आहे. संबंधित प्रकरणी नगर दक्षिणेचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगत तालुक्यातील ३५ हजार ५२३ शेतकर्‍यांच्या वतीने विश्वनाथ दादा कोरडे, जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते सर, पारनेर भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, डॉ. भाऊसाहेब खिलारी या सर्वांनीच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील विशेष आभारही यावेळी मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...