spot_img
अहमदनगरAhmednagar News : दोन लाख द्या काम करुन घ्या ! मनपात भ्रष्टाचाराचा...

Ahmednagar News : दोन लाख द्या काम करुन घ्या ! मनपात भ्रष्टाचाराचा कळस, भरसभेत ‘या’ नगरसेवकांनी

spot_img

‘नगररचना विभागात २२१ प्रकरणे प्रलंबित’

अहमदनगर | नगर सह्याद्री-
महापालिकेच्या नगररचना विभागात कर्मचार्‍यांकडे अनेक दिवसांपासून तब्बल २२१ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी नगररचना विभागातील अडवणूक व भ्रष्टाचाराची पोलखोल करत कर्मचार्‍यांवर गंभीर आरोप केले.

आयुक्त पंकज जावळे यांनी कर्मचार्‍यांकडे प्रलंबित प्रकरणांची माहिती मागवली आहे. अडवणूक करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्त जावळे यांनी सांगितले.नगररचना विभागात अधिकार्‍यांऐवजी कर्मचारी प्रकरणे अडवतात, एकेका मंजुरीसाठी दोन लाख रुपये मागतात, अशा तक्रारी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर व नगरसेवक कुमार वाकळे यांनी केल्या होत्या. नगरसेवकांनाही पैसे देऊन कामे करून घ्यावी लागतात. नगरसेवकांनी फोन केला, तर कर्मचारी वाढीव पैसे लागतील, असा दम नागरिकांना देतात, असे आरोप सभेत केले होते.

अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे नगररचना विभागातच ठाण मांडून आहेत.त्यांच्या बदल्या का होत नाही, असा सवाल नगरसेवकांनी केला. यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला. या विषयावरून महापालिकेची मोठी बदनामी झाल्याने आयुक्त जावळे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यासाठी त्यांनी कर्मचार्‍यांकडे छाननीसाठी प्रलंबित प्रकरणांची माहिती मागवली आहे. यात कर्मचार्‍यांनी अनेक दिवसांपासून २२१ प्रकरणे अडवून ठेवल्याचे समोर आले आहे. त्यावर आयुक्त काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...