spot_img
अहमदनगरAhmednagar News : चिंग्या साथीदारासह जेरबंद, जामखेडमध्ये मुकादमावर केला होता गोळीबार

Ahmednagar News : चिंग्या साथीदारासह जेरबंद, जामखेडमध्ये मुकादमावर केला होता गोळीबार

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : जामखेड गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (वय 20, रा. पाटोदा, ता. जामखेड), कुणाल जया पवार (वय 22, रा. कान्होपात्रा नगर, ता. जामखेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा व गुन्ह्यात वापरलेली इको कार ताब्यात घेण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी : फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण (वय 40, रा. भवरवाडी, ता. जामखेड) हे लेबर मुकादम आहेत. त्यांचेकडील मजूर लक्ष्मण कल्याण काळे यास अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने दीड वर्षांपूर्वी मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्यावर जामखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने त्याच्या साथीदारासह ३ मार्च रोजी फिर्यादीस शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळ्या झाडल्या. यात फिर्यादीचे उजव्या पायाचे पोटरीला दुखापत झाली होती.

ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पथक नेमून गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते. पोनि दिनेश आहेर यांनी दिनांक 3 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव व अंमलदार बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, विश्वास बेरड, विशाल दळवी, रोहित मिसाळ, बबन मखरे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, रणजीत जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे व भरत बुधवंत आदींचे पथक नेमून गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सूचना देत पथकास रवाना केले.

पथकाने घटना ठिकाणास भेट देत 2 दिवस घटना ठिकाण व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपींची माहिती घेतली. आरोपी हे विंचरणा नदीजवळ काटवनात लपून बसलेले असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलीस पथकाने त्या ठिकाणी जात कारवाई केली. तेथे कुणाल जया पवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याचे बाबत माहिती घेऊन त्यास जामखेडमधून अटक केली. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...