spot_img
अहमदनगरAhmednagar: आमदार तांबे यांचा परखड सवाल! कर्मचार्‍यांनी काढल्या पळवाटा, 'तो' नियम खरंच...

Ahmednagar: आमदार तांबे यांचा परखड सवाल! कर्मचार्‍यांनी काढल्या पळवाटा, ‘तो’ नियम खरंच लागू आहे का?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
राज्यात सार्वजनिक सेवा हक्क कायदा लागू असल्याने नागरिकांना कोणतेही सरकारी काम हे विशिष्ट कालावधीतच झाली पाहिजे, ते बंधनकारक आहे. परंतु, काही विभागातील सरकारी अधिकारी हे जाणीवपूर्वक पळवाटा काढतात. परिणामी, कार्यवाहीस विलंब होतो. त्यामुळे सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम खरंच लागू आहे का, असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात उपस्थित केला.

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम, २०१५ लागू आहे. त्यानुसार नागरिकाचं सरकारी काम ठराविक कालावधीत होणं बंधनकारक आहे. मात्र, शिक्षणविषयक विविध प्रस्तावांमध्ये शिक्षण विभागातील काही अधिकारी, कर्मचारी दीड वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर पुन्हा-पुन्हा जाणीवपूर्वक पळवाटा काढून कार्यवाहीस विलंब लावतात.

नाशिकमधील शिक्षकांच्या वाढीव पदांच्या मान्यतेसाठी दीड वर्षांनंतर मंत्रालयात शिक्षण विभागातील काही अधिकार्‍यांकडून त्रुटी काढण्यात आल्या. हा सार्वजनिक सेवा हक्क कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे.

हा प्रकार जाणूनबुजून घडतो की काय, अशी शंका सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत. अशा पळवाटांद्वारे लोकांचं काम विलंबाने करणार्‍या कर्मचार्‍यांवर आणि अधिकार्‍यांवर सरकार काय कारवाई करणार, असा रोखठोक सवाल आ. सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला.

आमदार सत्यजीत तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या यादीचे परिपत्रक काढू व सर्व कागदपत्रांची पूर्तता असूनही पळवाटा काढणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करू, असे केसरकर यांनी आश्वासन दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...