spot_img
अहमदनगरAhmednagar: आमदार तांबे यांचा परखड सवाल! कर्मचार्‍यांनी काढल्या पळवाटा, 'तो' नियम खरंच...

Ahmednagar: आमदार तांबे यांचा परखड सवाल! कर्मचार्‍यांनी काढल्या पळवाटा, ‘तो’ नियम खरंच लागू आहे का?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
राज्यात सार्वजनिक सेवा हक्क कायदा लागू असल्याने नागरिकांना कोणतेही सरकारी काम हे विशिष्ट कालावधीतच झाली पाहिजे, ते बंधनकारक आहे. परंतु, काही विभागातील सरकारी अधिकारी हे जाणीवपूर्वक पळवाटा काढतात. परिणामी, कार्यवाहीस विलंब होतो. त्यामुळे सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम खरंच लागू आहे का, असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात उपस्थित केला.

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम, २०१५ लागू आहे. त्यानुसार नागरिकाचं सरकारी काम ठराविक कालावधीत होणं बंधनकारक आहे. मात्र, शिक्षणविषयक विविध प्रस्तावांमध्ये शिक्षण विभागातील काही अधिकारी, कर्मचारी दीड वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर पुन्हा-पुन्हा जाणीवपूर्वक पळवाटा काढून कार्यवाहीस विलंब लावतात.

नाशिकमधील शिक्षकांच्या वाढीव पदांच्या मान्यतेसाठी दीड वर्षांनंतर मंत्रालयात शिक्षण विभागातील काही अधिकार्‍यांकडून त्रुटी काढण्यात आल्या. हा सार्वजनिक सेवा हक्क कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे.

हा प्रकार जाणूनबुजून घडतो की काय, अशी शंका सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत. अशा पळवाटांद्वारे लोकांचं काम विलंबाने करणार्‍या कर्मचार्‍यांवर आणि अधिकार्‍यांवर सरकार काय कारवाई करणार, असा रोखठोक सवाल आ. सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला.

आमदार सत्यजीत तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या यादीचे परिपत्रक काढू व सर्व कागदपत्रांची पूर्तता असूनही पळवाटा काढणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करू, असे केसरकर यांनी आश्वासन दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...