spot_img
अहमदनगरAhmednagar: जलजीवन योजनेतील पाण्याची टाकी चोरीला, ग्रामस्थांनी केला 'धक्कादायक' आरोप

Ahmednagar: जलजीवन योजनेतील पाण्याची टाकी चोरीला, ग्रामस्थांनी केला ‘धक्कादायक’ आरोप

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री-
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणार्‍या जलजीवन योजनेतील भ्रष्ट कारभाराचे अनेक किस्से चर्चेत आहेत.

यातच आता याच योजनेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाल्याचे दाखवून त्यापोटी लाखो रुपयांचे बिल संबंधीत ठेकेदाराला देण्याचा प्रताप जिल्हा परिषदेने केला आहे. वडगाव सावताळ येथील ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली असून संबंधीतांवर गुन्हे दाखल न केल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी वडगाव सावताळ येथे जलजीवन योजनेतून पाण्याच्या टाया आणि जलवाहिनी असे काम मंजूर होऊन त्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. योजनेच्या कामासाठी ठेकेदारही नियुक्त झाला. मात्र, सदरचे काम त्या ठेकेदाराने गावच्या सरपंचाला दिले असून सरपंचच ठेकेदार झाल्याची गावकर्‍यांची तक्रार आहे. सदरच्या कामाबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात तक्रार झाल्यानंतर या कामाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

अधिकारी आणि गावकर्‍यांनी केलेेल्या संयुक्त चौकशीत गावातील साळुंके वस्ती येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम झाल्याचे दाखवून त्यापोटी संबंधीत ठेकेदाराला बील देखील अदा करण्यात आल्याचे समोर आले. मात्र, प्रत्यक्षात त्या वस्तीवर पाण्याच्या टाकीचे बांधकामच आढळून आले नाही. वस्तीवरील लोकांनाही ही टाकी सापडत नसल्याने टाकीच चोरीला गेली असल्याचे वास्तव समोर आले. आता चोरीला गेलेली ही टाकी जिल्हा परिषद प्रशासन सापडून देणार आहे काय असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत. याबाबत दखल न घेतल्यास उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...