spot_img
अहमदनगरAhmednagar: जलजीवन योजनेतील पाण्याची टाकी चोरीला, ग्रामस्थांनी केला 'धक्कादायक' आरोप

Ahmednagar: जलजीवन योजनेतील पाण्याची टाकी चोरीला, ग्रामस्थांनी केला ‘धक्कादायक’ आरोप

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री-
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणार्‍या जलजीवन योजनेतील भ्रष्ट कारभाराचे अनेक किस्से चर्चेत आहेत.

यातच आता याच योजनेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाल्याचे दाखवून त्यापोटी लाखो रुपयांचे बिल संबंधीत ठेकेदाराला देण्याचा प्रताप जिल्हा परिषदेने केला आहे. वडगाव सावताळ येथील ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली असून संबंधीतांवर गुन्हे दाखल न केल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी वडगाव सावताळ येथे जलजीवन योजनेतून पाण्याच्या टाया आणि जलवाहिनी असे काम मंजूर होऊन त्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. योजनेच्या कामासाठी ठेकेदारही नियुक्त झाला. मात्र, सदरचे काम त्या ठेकेदाराने गावच्या सरपंचाला दिले असून सरपंचच ठेकेदार झाल्याची गावकर्‍यांची तक्रार आहे. सदरच्या कामाबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात तक्रार झाल्यानंतर या कामाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

अधिकारी आणि गावकर्‍यांनी केलेेल्या संयुक्त चौकशीत गावातील साळुंके वस्ती येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम झाल्याचे दाखवून त्यापोटी संबंधीत ठेकेदाराला बील देखील अदा करण्यात आल्याचे समोर आले. मात्र, प्रत्यक्षात त्या वस्तीवर पाण्याच्या टाकीचे बांधकामच आढळून आले नाही. वस्तीवरील लोकांनाही ही टाकी सापडत नसल्याने टाकीच चोरीला गेली असल्याचे वास्तव समोर आले. आता चोरीला गेलेली ही टाकी जिल्हा परिषद प्रशासन सापडून देणार आहे काय असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत. याबाबत दखल न घेतल्यास उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘राज्यमंत्री मंडळाची बैठक ‘या’ तारखेला अहिल्यानगरमध्ये भरणार’; जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार?

जामखेड । नगर सहयाद्री:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मे महिन्याच्या अखेरीस...

पूजा खेडकर प्रकरणात मोठा निर्णय; सुप्रिम कोर्टात काय घडलं?, वाचा एका क्लिकवर..  

IAS Pooja Khedkar News: UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा...

तुमच्या घरावर भानामती? कुटुंबावर संकट! दोन महिलांनी रचला डाव; ३३ लाखाची ‘अशी’ केली फसवणूक

Maharashtra Crime News: आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे. यातून फसवणूक झाल्याचे देखील समोर...

नागरिकाभिमुख कारभारासाठी महानगरपालिका कटीबद्ध; आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय कामकाजासाठी ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरू...