spot_img
अहमदनगरAhmednagar : लेकरासाठी पाठीची ढाल ! नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी अंगावर झेलला गारांचा...

Ahmednagar : लेकरासाठी पाठीची ढाल ! नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी अंगावर झेलला गारांचा पाऊस

spot_img

पारनेर / नगर सहयाद्री : रविवारी (दि.२६) झालेल्या गारपीटीने पारनेर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. यावेळी एका आजोबांनी आपल्या नातवाला वाचवण्यासाठी गारांचा पाऊस आपल्या अंगावर झेलला. दादाभाऊ पांढरे असे त्यांचे नाव आहे.

गारांपासून आपल्या नातवाचे त्यांनी संरक्षण केले परंतु त्यांची गारपिटीने त्यांची पाठ काळी निळी पडली होती. सध्या या आजोबांची चर्चा गांजीभोयरे व परिसरात पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शासन व प्रशासनाच्या वतीने या घटनेची कोणती दखल घेतली गेली नसून साधी चौकशीही पुढार्‍यांनी अथवा अधिकार्‍यांनी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रविवारी निघोज मंडळातील २४ गावांत गारपिटीने शेतकरी उध्वस्त झाला. गांजीभोयरे गावातील पांढरे परिवारातील नाना पांढरे यांचे वडील दादाभाऊ पांढरे हे रविवारी आपली जनावरे रानात चारत असताना अचानक दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह मोठ्या प्रमाणात गारा पडू लागल्या. लहान पाच वर्षांचा नातू सोबत असल्याने व जवळपास कुठलाही आडोसा नसल्याने आजोबांनी आपल्या पाच वर्षांच्या नातवाला पोटाखाली धरले व स्वतः गारांचा भडीमार आपल्या पाठीवर झेलला.

वाडीवस्तीवरील इतर काही इसमांना गारपिटीचा फटका बसला. सुमन शहाजी पांढरे ही महिला गारांच्या माराने व बाभळीची फांदी अंगावर पडल्याने बेशुद्ध पडली. गारपीटने हातात आलेली सोन्यासारखी पिके उध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकर्‍यांना द्यावी ही विनंती बळीराजा करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

थंडीने तीन वर्षांचा विक्रम मोडला; कुठे किती पहा

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : राजधानी दिल्लीमध्ये नोव्हेंबर महिन्यातच थंडीत मोठी वाढ जाणवू लागली...

मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना...

नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगर पंचायतीसाठी १० नोव्हेंबर पासून...