spot_img
अहमदनगरAhmednagar: नगरकरांनो पाणी प्रश्न सुटनार 'अमृत' योजनेचे ३० 'डिसेंबर' लोकार्पण होणार

Ahmednagar: नगरकरांनो पाणी प्रश्न सुटनार ‘अमृत’ योजनेचे ३० ‘डिसेंबर’ लोकार्पण होणार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
अमृत पाणी योजनेमुळे नगर शहाचा पाणी प्रश्न सुटला आहे. खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत पाणी योजनेचा ३० डिसेंबर रोजी वसंत टेकडी येथे लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रम स्थळाचा नियोजनाची पाहणी आमदार जगताप यांनी केली.

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मुळा धरण येथून १९७२ सालामध्ये नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पहिली योजना झाली आहे. त्या नंतर शहराचे विस्तारीकरण व नागरी वसाहती झपाट्याने वाढत असल्यामुळे नगरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.

पण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मुळा धरण ते विळद घाट आणि विळद घाट ते वसंत टेकडी पर्यंत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून वसंत टेकडी येथील ५० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत पाणी पडले आहे. फेज टू योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध भागात पाण्याच्या टाया उभारल्या आहेत.

त्यामध्ये अमृत पाणी योजनेचे पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नगरकरांना पूर्ण दाबाने आणि वेळेवर पाणी पुरवठा होणार आहे. अनेक वर्षाचा शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागत असल्याचा आनंद होत आहे, असे ते म्हणाले. यावेळी जल अभियंता परिमल निकम, माजी नगरसेवक निखिल वारे, इंजि. गणेश गाडळकर, साहेबान जहागिरदार, इंजि.शिंदे, वैभव वाघ, सागर गोरे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...