spot_img
अहमदनगरAhmednagar: नगरकरांनो पाणी प्रश्न सुटनार 'अमृत' योजनेचे ३० 'डिसेंबर' लोकार्पण होणार

Ahmednagar: नगरकरांनो पाणी प्रश्न सुटनार ‘अमृत’ योजनेचे ३० ‘डिसेंबर’ लोकार्पण होणार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
अमृत पाणी योजनेमुळे नगर शहाचा पाणी प्रश्न सुटला आहे. खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत पाणी योजनेचा ३० डिसेंबर रोजी वसंत टेकडी येथे लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रम स्थळाचा नियोजनाची पाहणी आमदार जगताप यांनी केली.

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मुळा धरण येथून १९७२ सालामध्ये नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पहिली योजना झाली आहे. त्या नंतर शहराचे विस्तारीकरण व नागरी वसाहती झपाट्याने वाढत असल्यामुळे नगरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.

पण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मुळा धरण ते विळद घाट आणि विळद घाट ते वसंत टेकडी पर्यंत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून वसंत टेकडी येथील ५० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत पाणी पडले आहे. फेज टू योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध भागात पाण्याच्या टाया उभारल्या आहेत.

त्यामध्ये अमृत पाणी योजनेचे पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नगरकरांना पूर्ण दाबाने आणि वेळेवर पाणी पुरवठा होणार आहे. अनेक वर्षाचा शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागत असल्याचा आनंद होत आहे, असे ते म्हणाले. यावेळी जल अभियंता परिमल निकम, माजी नगरसेवक निखिल वारे, इंजि. गणेश गाडळकर, साहेबान जहागिरदार, इंजि.शिंदे, वैभव वाघ, सागर गोरे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईड सैफुल्ला खालिद कसुरी? वाचा, माहिती..

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम शहराजवळील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन...

स्कुटीवर चाललेल्या दोन महिलावर अ‍ॅसीड फेकले; अहिल्यानगर जिल्ह्यात भयंकर प्रकार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथील माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी आजचा दिवस सर्वोत्कृष्ट

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल –...

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...