spot_img
अहमदनगरAhmednagar : भाळवणीत अपघात, दोन तरुण ठार

Ahmednagar : भाळवणीत अपघात, दोन तरुण ठार

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : नगर कल्याण महामार्गावर भाळवणी येथे चारचाकी व दुचाकीच्या अपघातात दोन तरुण ठार झाले. रविवारी सायंकाळी ८ वाजता हा अपघात घडला. नितीन दगडू नांगरे ( वय ३१ वर्ष, रा.गोरेगाव), कैलास अशोक कोरडे (वय २९ वर्ष, रा.हिवरे कोरडा) अशी मृतांची नावे आहेत.

नितीन नांगरे व कैलास कोरडे हे दुचाकीवरून नगरकडे जात होते. समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने त्यांना धडक दिली. अपघातानंतर दोघांनाही जखमी अवस्थेत तात्काळ पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर चारचाकी चालक गाडी जाग्यावरच सोडून पसार झाला होता. माधव पिरतुजी नांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर कल्याण महामार्गावर हॉटेल गुरुकृपा समोर अपघात झाल्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती. हेड कॉन्स्टेबल शैलेश रोहोकले, मृत्युंजय दूत, आदिनाथ भागवत यांच्या प्रयत्नाने वाहतूक सुरुळीत सुरु करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी यावेळी मदत केली.

घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे, अप्पा डमाळे, किरण भापकर करत आहेत. सोमवारी दुपारी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोरेगाव व हिवरे कोरडा गावावर शोककळा पसरली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...