spot_img
महाराष्ट्रPolitics News: विधानसभेसाठी अजित पवार गट आक्रमक! मंत्री भुजबळांच मोठं वक्तव्य, पहा...

Politics News: विधानसभेसाठी अजित पवार गट आक्रमक! मंत्री भुजबळांच मोठं वक्तव्य, पहा काय म्हणाले..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शयता आहे. राज्यात ऑटोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शयता आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय नेत्यांकडून लगबग सुरु होण्याची शयता आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभेचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीकडून विधानसभेत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भरसभेत मागणी केली आहे.

राज्यातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मुंबईत अजित पवार गटाची पहिली कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले, पहिली निवडणूक संपली आहे. तोच दुसरी निवडणूक सुरु झाली आहे.

आचारसंहिता सुरु होतील. आचारसंहिता सुरु झाल्यामुळे काम थांबतील. माझे मुख्यमंत्र्यांना सांगण आहे की, मार्ग काढायला पाहिजे. जेणेकरून आमदारांना ताकद मिळेल. भाजपने ४०० पारचा नारा दिलाय, त्यामुळे विरोधकांकडून दलित समाजात संविधान बदलणार हे सांगितलं गेलं. ते लोकांच्या मनातून काढण्यासाठी नाकीनऊ आले.

पंतप्रधान मोदींनाही वारंवार संविधान बदलणार नाही हे सांगावे लागत आहे. अजित दादा, पुढील निवडणुकीत योग्य त्या जागा मिळायला पाहिजे. आता झालं ते झालं. पुढील निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळायला पाहिजे. त्यातील किमान ५० ते ६० निवडून येतील, असे भुजबळ पुढे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....