spot_img
महाराष्ट्रPolitics News: विधानसभेसाठी अजित पवार गट आक्रमक! मंत्री भुजबळांच मोठं वक्तव्य, पहा...

Politics News: विधानसभेसाठी अजित पवार गट आक्रमक! मंत्री भुजबळांच मोठं वक्तव्य, पहा काय म्हणाले..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शयता आहे. राज्यात ऑटोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शयता आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय नेत्यांकडून लगबग सुरु होण्याची शयता आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभेचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीकडून विधानसभेत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भरसभेत मागणी केली आहे.

राज्यातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मुंबईत अजित पवार गटाची पहिली कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले, पहिली निवडणूक संपली आहे. तोच दुसरी निवडणूक सुरु झाली आहे.

आचारसंहिता सुरु होतील. आचारसंहिता सुरु झाल्यामुळे काम थांबतील. माझे मुख्यमंत्र्यांना सांगण आहे की, मार्ग काढायला पाहिजे. जेणेकरून आमदारांना ताकद मिळेल. भाजपने ४०० पारचा नारा दिलाय, त्यामुळे विरोधकांकडून दलित समाजात संविधान बदलणार हे सांगितलं गेलं. ते लोकांच्या मनातून काढण्यासाठी नाकीनऊ आले.

पंतप्रधान मोदींनाही वारंवार संविधान बदलणार नाही हे सांगावे लागत आहे. अजित दादा, पुढील निवडणुकीत योग्य त्या जागा मिळायला पाहिजे. आता झालं ते झालं. पुढील निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळायला पाहिजे. त्यातील किमान ५० ते ६० निवडून येतील, असे भुजबळ पुढे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...