spot_img
महाराष्ट्रगडकरींपाठोपाठ अजित पवार व फडणवीस अमित शाहांच्या भेटीला ! 'हे' आहे सर्वात...

गडकरींपाठोपाठ अजित पवार व फडणवीस अमित शाहांच्या भेटीला ! ‘हे’ आहे सर्वात मोठे कारण

spot_img

नगर सहयाद्री / मुंबई : राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थात अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे दोघेही केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यांनी आधी नितीन गडकरी यांची भेट घेतली. आता ते दिला जाणार आहेत.

या मागे कोणतेही राजकीय नियोजन नाही तर महाराष्ट्रातील निर्माण झालेला कांदा प्रश्न आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव गडगडले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झालेत. तसेच केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचे आदेश दिल्याने कारखानदार व शेतकरी यांना याचा फटका बसणार आहे.

सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल यात शंका नाही. याच कारण असे की, देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर गडगडू लागले आहेत. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. राज्यातले विरोधी पक्षदेखील केंद्र सरकारवर टीका करू लागले आहेत.

अशातच राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...