spot_img
महाराष्ट्रगडकरींपाठोपाठ अजित पवार व फडणवीस अमित शाहांच्या भेटीला ! 'हे' आहे सर्वात...

गडकरींपाठोपाठ अजित पवार व फडणवीस अमित शाहांच्या भेटीला ! ‘हे’ आहे सर्वात मोठे कारण

spot_img

नगर सहयाद्री / मुंबई : राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थात अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे दोघेही केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यांनी आधी नितीन गडकरी यांची भेट घेतली. आता ते दिला जाणार आहेत.

या मागे कोणतेही राजकीय नियोजन नाही तर महाराष्ट्रातील निर्माण झालेला कांदा प्रश्न आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव गडगडले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झालेत. तसेच केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचे आदेश दिल्याने कारखानदार व शेतकरी यांना याचा फटका बसणार आहे.

सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल यात शंका नाही. याच कारण असे की, देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर गडगडू लागले आहेत. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. राज्यातले विरोधी पक्षदेखील केंद्र सरकारवर टीका करू लागले आहेत.

अशातच राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...