spot_img
महाराष्ट्रगडकरींपाठोपाठ अजित पवार व फडणवीस अमित शाहांच्या भेटीला ! 'हे' आहे सर्वात...

गडकरींपाठोपाठ अजित पवार व फडणवीस अमित शाहांच्या भेटीला ! ‘हे’ आहे सर्वात मोठे कारण

spot_img

नगर सहयाद्री / मुंबई : राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थात अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे दोघेही केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यांनी आधी नितीन गडकरी यांची भेट घेतली. आता ते दिला जाणार आहेत.

या मागे कोणतेही राजकीय नियोजन नाही तर महाराष्ट्रातील निर्माण झालेला कांदा प्रश्न आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव गडगडले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झालेत. तसेच केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचे आदेश दिल्याने कारखानदार व शेतकरी यांना याचा फटका बसणार आहे.

सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल यात शंका नाही. याच कारण असे की, देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर गडगडू लागले आहेत. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. राज्यातले विरोधी पक्षदेखील केंद्र सरकारवर टीका करू लागले आहेत.

अशातच राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...