spot_img
लाईफस्टाईल२०० वर्षानंतर बनतायेत ३ राजयोग ! 'या' राशींना मिळेल अपार पैसा, पद...

२०० वर्षानंतर बनतायेत ३ राजयोग ! ‘या’ राशींना मिळेल अपार पैसा, पद प्रतिष्ठा

spot_img

नगर सह्याद्री टीम : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करत असतात. त्यानुसार ते शुभ आणि राजयोग तयार करतात. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. पुढील महिन्यात मार्चमध्ये 3 राजयोग तयार होणार आहेत.

ज्यामध्ये कुंभ राशीत शनिदेवाच्या परिवर्तनामुळे शश महापुरुष राजयोग तयार होत आहे. त्याचबरोबर मंगळच्या उच्च राशीत प्रवेश केल्यामुळे शश राजयोग तयार झाला आहे. तसेच, शुक्र मार्चमध्ये मीन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल. सुमारे 200 वर्षांनंतर हा राजयोग तयार होत आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मकर
तीनही राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल. तुमचे व्यक्तिमत्वही सुधारेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुम्ही ते पूर्ण फेडू शकाल. यावेळी तुम्ही काही मालमत्ता देखील खरेदी करू शकता. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या कारणास्तव प्रवास देखील करू शकता, जे शुभ राहील. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.

वृषभ
तीन राजयोगांची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती होईल. तसेच तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. तसेच, या राजयोगाच्या निर्मितीमुळे, व्यवसाय चांगला चालेल आणि तुमची आर्थिक समृद्धी देखील होईल. तुम्हाला करिअरच्या प्रगतीसाठी अनेक सुवर्ण संधी मिळतील आणि मित्रांसोबत लांब पल्ल्याच्या सहलीला जाऊ शकता. नशीब तुमच्या बाजूने असल्याने संपत्ती वाढीच्या अनेक संधी मिळतील आणि तुमची बँक बॅलन्सही वाढेल. तसेच, जे बेरोजगार आहेत त्यांना यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच, तुमच्या वडिलांसोबत तुमचे नाते मजबूत राहील.

मिथुन
राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. त्यामुळे यावेळी मेहनतीसोबत नशीबही तुमच्या पाठीशी असेल. करिअरच्या प्रगतीसाठी तुम्हाला अनेक सुवर्ण संधी मिळतील. यावेळी तुम्ही देश-विदेशात सहलीलाही जाऊ शकता, जे शुभ राहील. त्याच वेळी, व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. तिथे मोठे बिझनेस डील फायनल होऊ शकतो. ज्याचा भविष्यात फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...