spot_img
ब्रेकिंगघातपात वार ! दोन भीषण अपघात, १२ लोक जागीच ठार

घातपात वार ! दोन भीषण अपघात, १२ लोक जागीच ठार

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री : रविवारचा दिवस घातपात वार ठरला असून दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात १२ लोक जागीच ठार झाले. यातील पहिली अपघाताची घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरच्या चंदनापुरी गावाजवळ घडली. यात अकोले येथील चौघे ठार झाले. तर दुसरी घटना अहमदनगर – कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ रविवारी रात्री घडली. यात आठ लोक जागीच ठार झाले आहेत.

पहिल्या घटनेत नाशिक – पुणे महामार्गावर संगमनेरच्या चंदनापुरी गावाजवळ मालवाहतूक ट्रक कारवर कोसळून अपघात झाला. यात चौघे जागीच ठार झाले. ही घटना काल (दि.१७ डिसेंबर) रात्री आठ वाजता घडली. यात आशा सुरेश धारणकर (वय ४२), सुनील धारणकर (वय ६५), अभय सुरेश धारणकर (वय ४५) व ओजवी धारणकर (वय २ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. यात अस्मिता अभय मिसाळ (वय ४०) या जखमी आहेत. अपघातातील मृत व जखमी अकोले तालुक्यातील कुंभेफळ गावातील रहिवासी आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला होता. हा अपघात कोणत्या कारणास्तव किंवा कोणाच्या चुकीमुळे झाला याचा उलगडा अद्याप झाला नाही. जखमी महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर व फरार ट्रकचालक ताब्यात आल्यानंतर इतर गोष्टींचा उलगडा होईल.

दुसरी घटना अहमदनगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात 8 लोक ठार झाले असून मृतांत एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. भाजीपाला घेऊन चाललेल्या भरधाव पीकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चौघे मृत हे एकाच कुटुंबातील आहेत. ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने पिकअप चालला होता. त्याचवेळी कल्याणकडून ओतूरकडे प्रवासी रिक्षा आलेली होती.

डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपा समोर या दोघांची जोराची धडक झाली. यात रिक्षाचा चालक, दोन प्रवासी, पिकअप चालक, कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, मुलगा मुलगी आणि मागे बसलेला हमाल यांचा जागीच मृत्यू झाला. गणेश मस्करे (30), कोमल मस्करे (25), हर्षद मस्करे (4), काव्या मस्करे (6), अमोल मुकुंदा ठोके, नरेश नामदेव दिवटे (66), अन्य दोघे (नाव माहित नाहीत) अशी मृतांची नावे आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...