spot_img
अहमदनगरAccident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

spot_img

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ज (दि.२०) सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घडली. अशी माहिती गोंदी पोलीसांनी दिली.

सविस्तर असे की, गेवराईहून जालन्याकडे जाणारी गेवराई आगार बस क्रमांक एम एच २० बी एल ३५७३ व अंबडहून संत्रा घेऊन येणारा आयशर क्रमांक एम एच ०१सी आर ८०९९ चा वडीगोद्री जालना मार्गावरील शहापूर जवळ भीषण अपघात झाला. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने मठतांडा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. यात सहाजण जागीच ठार झाले. तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. या अपघातामधील सहा मृतांपैकी गेवराई येथील वाहक बंडू बारगजे (वय वर्षे ५०) रा. गेवराई व रामपूरी येथील पंचफुला बाई सोळुंके यांची नावे समजली असून इतर जणांचे नाव अद्याप समजली नाहीत. त्याचबरोबर जखमींचे नावे समजू शकली नाहीत. या बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश होता.

अपघात होताच घटनास्थळी मठतांडा येथील नागरिकांनी धाव घेतली. जखमींना बसमधुन बाहेर काढले. अपघाताची पोलीसांना माहिती देताच घटनास्थळी गोंदी पोलिस व वाहतूक पोलिसानी धाव घेत जखमींना रूग्णवाहिका द्वारे अंबड जालना हलविण्यात आले. भीषण अपघातामुळे अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...