spot_img
देशमहाशिवरात्रीच्या मिरवणुकीत दुर्घटना ! विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत दुर्घटना ! विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली

spot_img

राजस्थान / नगर सह्याद्री : महाशिवरात्रीच्या दिवशीच एका मिरवणुकीत दुर्घटना झाल्याचे वृत्त आले आहे. भगवान शंकराच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली.

राजस्थानच्या कोटामध्ये आज (दि.८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुन्हडी थर्मल चौकाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि स्थानिकांनी तात्काळ जखमी मुलांना घेऊन हॉस्पिटल गाठले. अपघाताची माहिती जखमी मुलांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी देखील रुग्णालयाकडे धाव घेतली.

सर्व जखमी मुलांना उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि ऊर्जा मंत्री हिरालाल नागर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी मुलांची भेट घेटली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींपैकी एक मुलगा 70 टक्के, तर दुसरा 50 टक्के भाजला आहे. उर्वरित मुले 10-15 टक्के भाजली आहेत. सर्वांचे वय 9 ते 16 वर्षे दरम्यान आहे. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, विजेचा झटका लागल्याची घटना घडल्यानंतर जखमी मुलांच्या संतप्त कुटुंबीयांनी आयोजकांवर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांना जोरदार मारहाण केली असल्याचे वृत्त आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुपा एमआयडीसीत कंपनीने केला विश्वासघात! 150 युवकांना नोकरीच्या नावाखाली फसवले

सुपे MIDC मधील GMCC कंपनीत 150 युवकांवर अन्याय../ पारनेर भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोज...

देवेंद्रजी, नगरमध्ये बीडीओच लाचखोर निघाला हो!

मिनी मंत्रालय झाले अधिकाऱ्यांचे चरण्याचे कुरण | आनंद भंडारी यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषद- पंचायत...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार बिनव्याजी कर्ज..

मुंबई । नगर सहयाद्री राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मोठा दिलासा...

केडगावात विजेचा लपंडाव! माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला इशारा; ‌‘वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा… ’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगराचा गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे...