spot_img
देशमहाशिवरात्रीच्या मिरवणुकीत दुर्घटना ! विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत दुर्घटना ! विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली

spot_img

राजस्थान / नगर सह्याद्री : महाशिवरात्रीच्या दिवशीच एका मिरवणुकीत दुर्घटना झाल्याचे वृत्त आले आहे. भगवान शंकराच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली.

राजस्थानच्या कोटामध्ये आज (दि.८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुन्हडी थर्मल चौकाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि स्थानिकांनी तात्काळ जखमी मुलांना घेऊन हॉस्पिटल गाठले. अपघाताची माहिती जखमी मुलांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी देखील रुग्णालयाकडे धाव घेतली.

सर्व जखमी मुलांना उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि ऊर्जा मंत्री हिरालाल नागर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी मुलांची भेट घेटली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींपैकी एक मुलगा 70 टक्के, तर दुसरा 50 टक्के भाजला आहे. उर्वरित मुले 10-15 टक्के भाजली आहेत. सर्वांचे वय 9 ते 16 वर्षे दरम्यान आहे. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, विजेचा झटका लागल्याची घटना घडल्यानंतर जखमी मुलांच्या संतप्त कुटुंबीयांनी आयोजकांवर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांना जोरदार मारहाण केली असल्याचे वृत्त आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...