spot_img
देशमहाशिवरात्रीच्या मिरवणुकीत दुर्घटना ! विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत दुर्घटना ! विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली

spot_img

राजस्थान / नगर सह्याद्री : महाशिवरात्रीच्या दिवशीच एका मिरवणुकीत दुर्घटना झाल्याचे वृत्त आले आहे. भगवान शंकराच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली.

राजस्थानच्या कोटामध्ये आज (दि.८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुन्हडी थर्मल चौकाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि स्थानिकांनी तात्काळ जखमी मुलांना घेऊन हॉस्पिटल गाठले. अपघाताची माहिती जखमी मुलांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी देखील रुग्णालयाकडे धाव घेतली.

सर्व जखमी मुलांना उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि ऊर्जा मंत्री हिरालाल नागर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी मुलांची भेट घेटली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींपैकी एक मुलगा 70 टक्के, तर दुसरा 50 टक्के भाजला आहे. उर्वरित मुले 10-15 टक्के भाजली आहेत. सर्वांचे वय 9 ते 16 वर्षे दरम्यान आहे. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, विजेचा झटका लागल्याची घटना घडल्यानंतर जखमी मुलांच्या संतप्त कुटुंबीयांनी आयोजकांवर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांना जोरदार मारहाण केली असल्याचे वृत्त आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...