spot_img
अहमदनगरखुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा रद्द; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा रद्द; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

श्रीरामपूर येथील खून खटल्यातील आरोपी पराग पठारे याच्यासह इतर आरोपींना श्रीरामपूर सत्र न्यायलयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली असल्याची माहिती अ‍ॅड. एन. बी. नरवडे यांनी दिली आहे. परिस्थितीजन्य पुरावा निष्पन्न न झाल्यामुळे उच्च न्यायालयाने आरोपींच्या विरोधातील जन्मठेपेची शिक्षा रद्द बातल ठरविली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावावत सविस्तर वृत्त असे की, सुनिल सिताराम दौंड यांनी श्रीरामपुर पोलीस स्टेशन येथे २५ मार्च २०१५ रोजी फिर्याद दिली होती होती. त्याचा भाचा गणेश गोरक्ष चांदगुडे हा शिक्षणानिमित्त मातापुर, ता. श्रीरामपुर येथे राहावयास होता. तो १२ वी मध्ये आर.बी.एन.वी. कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता. १२ मार्च २०१५ रोजी मयत गणेश हा त्याचे मित्र आरोपी पराग पठारे याच्या घरी श्रीरामपुर येथे जातो असे सांगुन श्रीरामपुर येथे निघुन आला. परंतु तो घरी आला नव्हता. त्यानंतर दि. २२ मार्च २०१५ रोजी त्याचे मोबाईलवरून मयताच्या आईस फोन करून सदरील व्यक्तीने एक करोड रुपयाची मागणी केली होती.

पोलीसात तक्रार दिल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २४ मार्च २०१५ रोजी मयताच्या आईच्या मोबाईलवर मिस कॉल आला होता. मयत गणेश मिळुन न आल्याने फिर्यादीच्या फिर्यादीनुसार श्रीरामपुर पोलीस स्टेशन येथे सुरुवातीला भा.द.वी. करून ३६३, ३८५, ३८७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तदनंतर आरोपीच्या विरोधात भा.द.वी कलम ३०२ व इतर कलमाखाली आरोपी पराग पठारे व अजय दिनकर मोरे, धिरज शिंदे यांच्या विरोधात चार्ज शिट दाखल करण्यात आले होती. या संदर्भात सर्व सूनावणी श्रीरामपूर सत्र न्यायालयात झाली. २६ मार्च २०१८ रोजी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान जन्मठेपेच्या शिक्षेतील आरोपी पराग पठारे व इतर यांनी मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये वेगवेगळे अपील दाखल केले होते. आरोपी पराग मच्छींद्र पठारे यांनी अ‍ॅड. एन.बी. नरवडे यांच्या मार्फत अपील दाखल केले होते. सदरील अपीलाची सुनावणी दरम्यान उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती आर. जी. अवचट व न्यायमुर्ती आर.जी. धोटे यांच्या खंडपीठाने सर्व आरोपींचे युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपीस मृत्युच्या पुर्वी हॉटेल राजयोग येथे घेऊन गेल्याचा पुरावा निष्पन्न झाला नाही. तसेच सी.ए.रिपोर्ट मध्ये अल्कोहोलचे कन्टेंन्टस मिळुन आले नाही. आरोपी विरुध्द कुठलाही सबल पुरावा निष्पन्न होत नाही. तसेच परिस्थितीजन्य पुरावा निष्पन्न न झाल्यामुळे उच्च न्यायालयाने आरोपींच्या विरोधातील जन्मठेपेची शिक्षा रद्द बातल ठरविली असल्याची माहिती अ‍ॅड. नरवडे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...