spot_img
महाराष्ट्रअभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रतिउत्तर देत घणाघात

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रतिउत्तर देत घणाघात

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली.ते ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले. आता विरोधकांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. विरोधकांचे आरोप राजकीय असून त्यांनी राजीनाम्याची मागणी केली त्यात आश्चर्य वाटत नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

घोसाळकर हत्या प्रकरणी फडणवीस म्हणाले की, अभिषेक घोसाळकर यांच्याबाबतीत घडलेली घटना दु:खद आहे. एका तरुण नेत्याचे असं निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायेत हे योग्य नाही.

ही घटना गंभीर असली तरी ज्याने गोळ्या घातलेल्या तो मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे एकत्रित पोस्टर्स पाहायला मिळतात. वर्षोनुवर्ष ते एकत्रित काम करतायेत. आता कुठल्या विषयातून मॉरिसनं अभिषेकवर गोळ्या झाडल्या आणि स्वत:लाही गोळ्या मारून घेतल्या हा निश्चितपणे महत्त्वाचा विषय आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत विरोधक पूर्णपणे राजकीय आरोप करत आहेत. ही घटना गंभीर आहे. परंतु विरोधी पक्षाची स्थिती अशी झालीय की एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. मात्र ही घटना गंभीर असल्याने विरोधक राजीनामा मागतायेत त्यात आश्चर्य वाटत नाही. या सगळ्या घटनांचे राजकारण ते विरोधक करू इच्छित आहेत. ही जी हत्या झालीय ती वैयक्तिक वैमनस्यातून झालेली आहे ही विरोधकांना माहिती आहे. पण विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करतोय असा टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...