spot_img
ब्रेकिंगअबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीमधील मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात एकच गोंधळ केला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. राज्यातील अमरावतीत मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. अमरावतीच्या ड्रीमलँडमधील एआरएन असोसिएट परीक्षा सेंटरवरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

परीक्षेवर कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याकडूनच एका विद्यार्थ्यांला उत्तरे कॉपी पुरवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप केला आहे. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं की, ‘जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टीद्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटरवर तलाठीचा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकारला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत.

‘अमरावतीच्या सेंटर ARN Associate या सेंटरवर तलाठीचा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता येत नाही, तर मग परीक्षा तरी का घेता.सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत. तत्काळ WCD ची परीक्षा थांबवावी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! हत्या की आत्महत्या? पती-पत्नीचा ‘तसल्या’ अवस्थेत आढळला मृतदेह..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील गोगलगाव (ता. राहाता) येथे गुरुवारी एका पती-पत्नीचा संशयास्पद...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना’अच्छे’ दिन? वाचा, भविष्य..

मुंबई / नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल-त्यामुळे तुमच्या कुटुंबातील...

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...