spot_img
ब्रेकिंगअबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीमधील मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात एकच गोंधळ केला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. राज्यातील अमरावतीत मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. अमरावतीच्या ड्रीमलँडमधील एआरएन असोसिएट परीक्षा सेंटरवरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

परीक्षेवर कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याकडूनच एका विद्यार्थ्यांला उत्तरे कॉपी पुरवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप केला आहे. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं की, ‘जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टीद्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटरवर तलाठीचा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकारला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत.

‘अमरावतीच्या सेंटर ARN Associate या सेंटरवर तलाठीचा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता येत नाही, तर मग परीक्षा तरी का घेता.सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत. तत्काळ WCD ची परीक्षा थांबवावी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...