spot_img
ब्रेकिंगअबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीमधील मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात एकच गोंधळ केला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. राज्यातील अमरावतीत मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. अमरावतीच्या ड्रीमलँडमधील एआरएन असोसिएट परीक्षा सेंटरवरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

परीक्षेवर कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याकडूनच एका विद्यार्थ्यांला उत्तरे कॉपी पुरवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप केला आहे. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं की, ‘जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टीद्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटरवर तलाठीचा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकारला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत.

‘अमरावतीच्या सेंटर ARN Associate या सेंटरवर तलाठीचा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता येत नाही, तर मग परीक्षा तरी का घेता.सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत. तत्काळ WCD ची परीक्षा थांबवावी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....