spot_img
देशअबब... छाप्यात सापडले दोन ट्रक नोटा; मोजता मोजता मशीनही पडले बंद

अबब… छाप्यात सापडले दोन ट्रक नोटा; मोजता मोजता मशीनही पडले बंद

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
आयकर विभागाने बुधवारी दोन राज्यांत टाकलेल्या छाप्यात इतकी रक्कम हाती लागली आहे की मोजणारी मशिनही बंद पडली. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा असून आयकर विभागाच्या या कारवाईमध्ये आणखी काय माहिती समोर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूल येथील मद्य निर्मिती कंपनीच्या आवारात आयकर विभागाने बुधवारी छापे टाकले. यावेळी आयटी पथकाने मोठी रोकड जप्त केली आहे. ही रक्कम एवढी होती की दोन दिवसांत २०० आणि ५०० रुपये मोजणार्‍या मशीननेही काम करणे बंद केले.

या कारवाईत जप्त केलेल्या रक्कमेमध्ये आतापर्यंत ५० कोटी रुपये मोजले गेले आहेत. या नोटा दोन ट्रकमध्ये भरून मोजणीसाठी बँकेत पाठवल्या होत्या. बुधवारी आयकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकाणांवर छापे टाकले. तपास पथकाने ओडिशातील संबलपूर आणि बोलंगीर येथे ही कारवाई केली. झारखंडच्या रांची आणि लोहरदगा येथील कंपनीच्या परिसराचीही पथकाने झडती घेतली.

आयकर विभागाने १५० कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती आहे. ज्या कंपनीच्या कार्यालयात इतकी मोठी रक्कम सापडली ती कंपनी पश्चिम ओडिशातील सर्वात मोठी दारू उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे बौद्ध डिस्टिलरीजशी व्यावसायिक संबंध आहेत. तितलगडमधील दारू माफियांच्या घरांवरही आयटी कंपनीने छापे टाकले. मात्र, सर्व आरोपी फरार झाले. या शिवाय आणखी एका मद्यनिर्मिती कंपनीच्या कार्यालयावर आयटी पथकाने छापा टाकून ११० कोटी रुपये जप्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....