spot_img
अहमदनगरसाईबाबा भक्तांसाठी महत्वाची बातमी; कोर्टांचा महत्वपूर्ण निर्णय...

साईबाबा भक्तांसाठी महत्वाची बातमी; कोर्टांचा महत्वपूर्ण निर्णय…

spot_img

उच्च न्यायालयाचे निर्देश
शिर्डी / नगर सह्याद्री –
साईबाबा मंदिर दर्शन, आरती पासची उच्च दरात विक्री होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणातील अहवालाची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने दर्शन व आरती पासेस काढण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. आधारकार्ड बंधनकारक केल्यामुळे गैरप्रकार थांबणार असल्याचे बोलले जाते.

न्यायालयाने मंदिर प्रशासनाला आदेश दिले आहेत की, दर्शन/आरती पास देण्यासाठी प्रत्येक भक्ताची माहिती घ्यावी. तसेच दर्शन/आरती पासवर आधार क्रमांक नमूद करावा. यामुळे पासची विक्री रोखण्यास मदत होईल.

याशिवाय कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जनहित याचिका दाखल करून मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या याचिकेत त्यांनी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्था केंद्रीय पोलीस राखीव दल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या मार्फत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर उच्च न्यायालय तिरुपती देवस्थानच्या सुरक्षेचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे. यासाठी तिरुपती देवस्थानकडून गोपनिय अहवाल मागविण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालामधील गंभीर निरीक्षणे लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षा संदर्भात काही एक बदल न करता सर्व सुरक्षा व्यवस्था प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षांच्या आदेशानुसारच चालेल अथवा बदलेल, असे निर्देश दिले. उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तो उच्च न्यायालयच्या आदेशाचा अवमान समजला जाईल, असे देखील आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर व अजिंय काळे काम पाहत आहेत. तर शासनाच्या वतीने अ‍ॅड. अमरजित गिरासे, संस्थानच्या वतीने अ‍ॅड. संजय मुंढे काम पाहत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सैफवरील हल्ला संशयास्पद! मंत्री नितेश राणेंची शंका; अजितदादा काय म्हणाले?

पुणे नगर सहयाद्री:- अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती....

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ३१ जानेवारीपर्यंत ‘हे’ काम करा; अन्यथा लाभ मिळणार नाही?

PM Kisan Yojana: केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...

अजबच! अहिल्यानगर जिल्ह्यात कुत्र्यावर गुन्हा दाखल?; नेमकं काय घडलं..

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चक्क कुत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात...

‘नाजूक’ संबंधामुळे संसाराला ‘तडा’! प्रियकराच्या मदतीने पतीला संपवल..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मिरजगाव (ता. कर्जत) येथे 10 जानेवारी रोजी एका 35-40 वर्षे...