spot_img
अहमदनगरसाईबाबा भक्तांसाठी महत्वाची बातमी; कोर्टांचा महत्वपूर्ण निर्णय...

साईबाबा भक्तांसाठी महत्वाची बातमी; कोर्टांचा महत्वपूर्ण निर्णय…

spot_img

उच्च न्यायालयाचे निर्देश
शिर्डी / नगर सह्याद्री –
साईबाबा मंदिर दर्शन, आरती पासची उच्च दरात विक्री होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणातील अहवालाची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने दर्शन व आरती पासेस काढण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. आधारकार्ड बंधनकारक केल्यामुळे गैरप्रकार थांबणार असल्याचे बोलले जाते.

न्यायालयाने मंदिर प्रशासनाला आदेश दिले आहेत की, दर्शन/आरती पास देण्यासाठी प्रत्येक भक्ताची माहिती घ्यावी. तसेच दर्शन/आरती पासवर आधार क्रमांक नमूद करावा. यामुळे पासची विक्री रोखण्यास मदत होईल.

याशिवाय कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जनहित याचिका दाखल करून मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या याचिकेत त्यांनी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्था केंद्रीय पोलीस राखीव दल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या मार्फत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर उच्च न्यायालय तिरुपती देवस्थानच्या सुरक्षेचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे. यासाठी तिरुपती देवस्थानकडून गोपनिय अहवाल मागविण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालामधील गंभीर निरीक्षणे लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षा संदर्भात काही एक बदल न करता सर्व सुरक्षा व्यवस्था प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षांच्या आदेशानुसारच चालेल अथवा बदलेल, असे निर्देश दिले. उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तो उच्च न्यायालयच्या आदेशाचा अवमान समजला जाईल, असे देखील आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर व अजिंय काळे काम पाहत आहेत. तर शासनाच्या वतीने अ‍ॅड. अमरजित गिरासे, संस्थानच्या वतीने अ‍ॅड. संजय मुंढे काम पाहत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...