spot_img
देशश्रीराम मंदिराच्या उदघाटन सोहळ्यास मंदिर उभारणीचे खरे हिरो लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर...

श्रीराम मंदिराच्या उदघाटन सोहळ्यास मंदिर उभारणीचे खरे हिरो लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींना न येण्याची विनंती ? पण का? पहा..

spot_img

नवी दिल्ली / नगरसह्याद्री : भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर होते. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर आता मंदिर उभे राहिले असून पुढील महिन्यात राममंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. देशभर याचा उत्सव साजरा केला जाणार आहे. परंतु या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी नसतील अशी माहिती मिळाली आहे.

या दोघांचीही प्रकृती आणि वयामुळे राममंदिराच्या अभिषेक सोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे असे मंदिराच्या ट्रस्टने माहीत दिली. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले की, “दोघेही या कुटुंबातील वरिष्ठ आहेत आणि त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना न येण्याची विनंती करण्यात आली होती, जी दोघांनीही मान्य केली होती.

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. १५ जानेवारीपर्यंत तयारी पूर्ण केली जाईल आणि प्राणप्रतिष्ठापनेची पूजा १६ जानेवारीपासून सुरू होईल आणि २२ जानेवारीपर्यंत चालू असेल.

निमंत्रितांची तपशीलवार यादी देताना राय म्हणाले की, अडवाणी आणि जोशी कदाचित आरोग्य आणि वयाशी संबंधित कारणांमुळे अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. आडवाणी आता ९६ वर्षांचे आहेत आणि जोशी पुढच्या महिन्यात ९० वर्षांचे होतील.

श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण कोणाला?
माजी पंतप्रधान देवेगौडा, शंकराचार्य सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यासाठी सुमारे ४००० ऋषी आणि २२०० इतर पाहुणेही असतील. यामध्ये काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी यांसारख्या मंदिरांचे प्रमुख आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश असेल. अध्यात्मिक गुरु दलाई लामा, केरळच्या माता अमृतानंदमयी, योगगुरू बाबा रामदेव, सिनेस्टार रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि प्रसिद्ध उद्योगपती जसे मुकेश अंबानी, अनिल अंबानी, सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव, निलेश देसाई आणि इतर अनेक मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...