spot_img
अहमदनगरकुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात एक दिवसीय धरणे आंदोलन, काय दिला इशारा पहा...

कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात एक दिवसीय धरणे आंदोलन, काय दिला इशारा पहा…

spot_img

आप्पा चव्हाण / श्रीगोंदा :

कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे नेते घनश्याम शेलार व सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

कुकडी, घोड, विसापूर, सीना हक्काचे पाणी मिळवण्यासाठी, शेतकरी व विज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ण दाबाने सुरळीत व अखंडपणे मिळण्यासाठी, अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळण्यासाठी हे धरणे आंदोलन तहसील कार्यालय समोर करण्यात आले.

शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग ओढविलेला आहे. एकीकडे कुकडीचे पाणी वेळेवर न मिळाल्याने शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळाचा तडाका, तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजेचा प्रश्न, यासारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत. यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे नेते घनश्याम शेलार व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावतीने श्रीगोंदा तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक २७ मे रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी घनश्याम शेलार बोलताना म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले पाहिजे. वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके व फळबागे पाण्याअभावी जळाले . आता येणारे पाणी श्रीगोंद्यापासून सुरुवात झाली पाहिजे, अवकाळी मुळे जे वादळ झाले आहेत त्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावी, तालुक्यातील वीज व्यवस्थापन सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी घनश्याम शेलार यांनी केली. तीन दिवसानंतर माणिक डोह नंतर येडगाव मध्ये पाणी सोडण्यात येईल. तसेच पाणी पुढे सोडण्यात येईल असे आश्वासन कुकडी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. तहसीलदार क्षितिजा वाघमारे व नायब तहसीलदार, कुकडी इरिगेशनचे अधिकारी, महावितरण चे अधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन भेट देऊन निवेदन स्वीकारले. यावेळेस स्मितल भैया वाबळे, प्रशांत दरेकर, मनोहर पोटे, उत्तम आबा नागवडे, मुकुंदराव सोनटक्के, बाळासाहेब सोनवणे, अरविंद कापसे, विकास शेळके, बाबासाहेब इथापे, श्याम झरे, शरद कुदांडे, नाना शिंदे, बाळासाहेब शेलार, संजय आनंदकर, प्रवीण शेलार आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी आंदोलनास उपस्थित होते.

तहसीलदार आंदोलन स्थळी न येता प्रथम नायब तहसिलदार आले असता परंतु आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार निवेदन घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. परंतु आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी तहसीलदार बाहेर या तहसीलदार बाहेर या अशा घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदारांनी आंदोलन स्थळी येत निवेदन स्वीकारले.
सर्व मागण्या वरिष्ठांना तात्काळ कळविण्यात येतील असे तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढचे ५ दिवस महत्वाचे, पावसाचा जोर वाढणर; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात पावसाचा जोर वाढत असून पुढचे पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने...

नगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याला पिकअपची धडक; वारकरी जखमी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणार्‍या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या...

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...