spot_img
ब्रेकिंगएका अंदाजाने कुटुंब संपवलं!! 'धक्कादायक' घटनेनं गाव हळहलं

एका अंदाजाने कुटुंब संपवलं!! ‘धक्कादायक’ घटनेनं गाव हळहलं

spot_img

हिंगोली। नगर सहयाद्री
हिंगोली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. डिग्रस शिवारामध्ये घडलेल्या घटनेत आई-वडिलांसह मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव असे मयत व्यक्तींचे नाव आहेत.

आकाश जाधव हे काल सायंकाळच्या सुमारास आपल्या आई-वडीलांना रुग्णालयात नेण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान, डिग्रस वाणी गावाच्या शिवारात असलेल्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. या अपघातामध्ये आकाश जाधव यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंबियांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असूनघटनेमुळे संपूर्ण वाणी गावावर शोककळा पसरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...