spot_img
अहमदनगरAhmednagar Today: बनावट कॉल आला आणि साडेतीन लाख घेऊन गेला! 'असा' घडला...

Ahmednagar Today: बनावट कॉल आला आणि साडेतीन लाख घेऊन गेला! ‘असा’ घडला प्रकार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट बँक खात्यावर जमा करण्यासाठी आलेल्या बनावट कॉलला प्रतिसाद दिल्याने महिलेच्या बँक खात्यातील तीन लाख २९ हजार ८०० रूपये काढून घेतल्याची घटना समोर आली. याप्रकरणी नगर-कल्याण रस्त्यावरील ड्रिम सिटी परिसरातील महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांचे ऍसीस बँकेच्या चितळे रस्त्यावरील शाखेत खाते आहे. त्या बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतात. मंगळवारी (दि. २६) दुपारी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून त्यांना फोन आला. त्या व्यक्तीने ऍसीस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट तुमच्या खात्यावर जमा होतील, अशी बातावणी करत मोबाईलवर पाठविलेला ओटीपी मागितला असता फिर्यादीने त्याला ओटीपी सांगितला. त्या व्यक्तीने फिर्यादीच्या व्हॉट्सअ‍ॅपला एक लिंक पाठविली व त्यावरून ऍसीस बँकेचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फोन बंद झाला. फिर्यादीने त्यावर पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.

काही वेळाने फिर्यादीच्या मोबाईलवर बँक खात्यातील पैसे डेबिट झाल्याचे मेसेज आले. एकुण तीन लाख २९ हजार ८०० रूपये त्या व्यक्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीने पतीसह ऍसीस बँकेच्या शाखेत धाव घेतली. तेथे चौकशी केली असता असा कोणताही फोन आम्ही केला नसल्याची माहिती बँकेतून देण्यात आली. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली.

 

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....