spot_img
ब्रेकिंगIND vs SA, Final: एक कॅच अन विजयाची मैच! टीम इंडियासाठी 'हा'...

IND vs SA, Final: एक कॅच अन विजयाची मैच! टीम इंडियासाठी ‘हा’ ठरला टर्निंग पॉईंट

spot_img

IND vs SA, Final: भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत विजय मिळवला आहे. यासह २००७ नंतर दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवने टिपलेली कॅच भारतीय संघासाठी टर्निंग पॉईंट ठरली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली. १८ व्या षटकापर्यंत दोन्ही संघांना विजयाची संधी होती. कारण डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. मात्र त्यावेळीच असं काही घडलं ज्याचा कोणीच विचार केला नव्हता.

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. या धावांचा बचाव करण्याची जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. पहिलाच चेंडू हार्दिकने फुल टॉस टाकला. ज्यावर डेव्हिड मिलरने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता. मात्र त्यावेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या सूर्यकुमार यादवने उडी मारत झेल टिपला. त्याने सीमारेषेच्या बाहेर जात असलेला चेंडू आत फेकला आणि हा झेल टिपला.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली आणि संघाची धावसंख्या १७६ धावांवर पोहचवली. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...