spot_img
महाराष्ट्रतेजस्वी तारा हरपला, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

तेजस्वी तारा हरपला, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

spot_img

पुणे। नगर सह्याद्री
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वात शोककळा पसरली आहे. सहजसोप्या भाषेत वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणाऱ्या नारळीकरांनी ‘व्हायरस’, ‘यक्षांची देणगी’ यांसारखी पुस्तके लिहिली जी खूप गाजली होती.

नारळीकर यांच्या जाण्याने वैज्ञानिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापुरात झाला. केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवणारे नारळीकर यांनी विश्वरचनाशास्त्र आणि सापेक्षतावादावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ फ्रेड हॉईल यांच्यासोबत ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडला. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) आणि आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र केंद्रात (IUCAA) त्यांनी मोलाचे योगदान दिले.

विज्ञानप्रसारासाठी त्यांनी मराठीतूनही अनेक पुस्तके लिहिली. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याने भारतीय खगोलशास्त्राला जागतिक स्तरावर मान मिळवून दिला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण आणि विश्वाच्या उत्पत्तीवर संशोधन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...