spot_img
देशभारत आणि इराण यांच्यात मोठा करार! व्यापारासाठी पाकची गरज संपणार? नवा मार्ग...

भारत आणि इराण यांच्यात मोठा करार! व्यापारासाठी पाकची गरज संपणार? नवा मार्ग मोकळा, वाचा सविस्तर

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम
भारत आणि इराण यांच्यात सोमवारी व्यापारासाठी म्हणत्वपुर्ण करार झाला आहे. नव्या करारामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार असून आता पाकिस्तानची गरज संपणार आहे.

भारत आणि इराण दोन दशकांपासून चाबहारवर काम करत आहेत. इराणमधील चाबहार येथील शहीद बेहेश्ती बंदरासाठी म्हणत्वपुर्ण करार झाला. करारासाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना भारतातून इराणला गेले होते. करारामध्ये 10 वर्षांसाठी बंदर करारात घेण्यात आले आहे.

पूर्वी भारतातून अफगाणिस्तानात कोणताही माल पाठवायचा असेल तर तो पाकिस्तानमधून जावा लागत होता. मात्र, दोन्ही देशांमधील सीमावादामुळे भारत पाकिस्तानशिवाय दुसरा पर्याय शोधत होता. आता माल पाठवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

यामध्ये चाबहार बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या बंदराच्या मदतीने भारत इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपशी थेट व्यापार करू शकतो. या बंदरामुळे व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार असून आता पाकिस्तानची गरज संपणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...