spot_img
देशभारत आणि इराण यांच्यात मोठा करार! व्यापारासाठी पाकची गरज संपणार? नवा मार्ग...

भारत आणि इराण यांच्यात मोठा करार! व्यापारासाठी पाकची गरज संपणार? नवा मार्ग मोकळा, वाचा सविस्तर

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम
भारत आणि इराण यांच्यात सोमवारी व्यापारासाठी म्हणत्वपुर्ण करार झाला आहे. नव्या करारामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार असून आता पाकिस्तानची गरज संपणार आहे.

भारत आणि इराण दोन दशकांपासून चाबहारवर काम करत आहेत. इराणमधील चाबहार येथील शहीद बेहेश्ती बंदरासाठी म्हणत्वपुर्ण करार झाला. करारासाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना भारतातून इराणला गेले होते. करारामध्ये 10 वर्षांसाठी बंदर करारात घेण्यात आले आहे.

पूर्वी भारतातून अफगाणिस्तानात कोणताही माल पाठवायचा असेल तर तो पाकिस्तानमधून जावा लागत होता. मात्र, दोन्ही देशांमधील सीमावादामुळे भारत पाकिस्तानशिवाय दुसरा पर्याय शोधत होता. आता माल पाठवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

यामध्ये चाबहार बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या बंदराच्या मदतीने भारत इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपशी थेट व्यापार करू शकतो. या बंदरामुळे व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार असून आता पाकिस्तानची गरज संपणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...