spot_img
ब्रेकिंगमहायुतीला मोठा धक्का; आज होणार तिसऱ्या आघाडीची घोषणा..?

महायुतीला मोठा धक्का; आज होणार तिसऱ्या आघाडीची घोषणा..?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री :-
राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने, राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्यात जोरदार बैठका होत असतानाच, महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता आहे.

आज छत्रपती संभाजीनगर येथे बच्चू कडू भव्य मोर्चा काढणार आहेत. या मोर्चातुन बच्चू कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीबाबत सूचक संकेत दिले आहेत, ज्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या तिसऱ्या आघाडीची चर्चा केली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते विधानसभेतून माघार घेऊ शकतात. त्यामुळे, बच्चू कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केल्यास, महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीचेही गणित बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या दृष्टीने बच्चू कडू काय निर्णय घेणार, हे राज्याच्या राजकीय वातावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! विनापरवाना पोस्टर्स लावणाऱ्यावर ‘ती’ कारवाई होणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचे...

व्यापारी असोसिएशनचा आयुक्तांपुढे समस्यांचा पाढा; मागणी काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील प्रमुख बाजारपेठेला अतिक्रमण धारकांनी विळखा घातला आहे. या अतिक्रमणांमुळे...

प्रियसीसाठी बायकोला सोडलं, मग तिसरीसोबत जुळलं, खटके उडताच नको तेच घडलं…

Maharashtra Crime News: प्रियकराने प्रियसीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, तरूणाने गर्लफ्रेंडसाठी...

नगरमध्ये औरंगजेबच्या नावाने अतिक्रमण; मनसे आक्रमक, दिला खळखट्याक इशारा..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अखंड हिंदूस्थानातील अतिक्रमणधारण असलेल्या औरंगजेबच्या नावाने शेवटची आंघोळ झाली म्हणून,...