spot_img
अहमदनगरAhmednagar News: आमदार 'आरोपी' चे 'बॉस? काही तर बिल्ला लाऊनच फिरतात; भाजप...

Ahmednagar News: आमदार ‘आरोपी’ चे ‘बॉस? काही तर बिल्ला लाऊनच फिरतात; भाजप नेत्याने थेट अजित पवार गटाच्या आमदारावर निशाणा साधला

spot_img

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही गोळीबाराची घटना घडली असून पुन्हा हे प्रकरण तापले आहे. कारण भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यकांवर गंभीर आरोप केले आहेत.

गुरूवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात हा गोळीबार झाला. या गोळीबारात तणवीर हमीफ रंगरेज (वय 36) हा तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान कोपरगाव गोळीबार प्रकरणानंतर भाजप नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहायक जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

विवेक कोल्हे नेमकं काय म्हणाले?
कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणात जे आरोपी अटक केले त्या आरोपींनी गोळीबार करण्याआधी आमदारांचे बॉस म्हणून स्टेटस ठेवले होते. आरोपीने आमदारांचे फ्लेक्स लाऊन बॉस म्हणून संबोधित केलं असून आमदार आरोपींना राजाश्रय देतात का? असा आरोप त्यांनी आमदार आशुतोष काळेंवर केला आहे. आरोपी नाझिम शेख आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोपरगाव शहरात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू आहेत. शहरात गुन्हा करणारे लोक आमदारांचा बिल्ला लाऊन शहरात फिरतात. आमदार म्हणाले विरोधकांना गाडून टाका. येणाऱ्या निवडणुकीत जनता आमदारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जखमी व्यक्तीने गोळीबार करणाऱ्यांची माहिती दिली आहे. पोलीस आरोपींवर काय कारवाई करणार? असा सवाल विवेक कोल्हेंनी उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Politics News: राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आंदोलन छेडणार! कारण काय? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics News; सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्तबाग महाल...

Ahmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाता लुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने...

Pitru Paksha: पितृपक्षात श्राद्ध विधी करणे गरजेचा का आहे? महाभारताच्या १३ व्या अध्यायात नेमकं काय? जाणून घ्या

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण...

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना...