spot_img
महाराष्ट्रसप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

spot_img

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि धरणे तुडूंब भरली आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट आहे.

या वर्षी भारतात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कमी दाबाची प्रणाली विकसित होऊन पाऊस पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

सामान्यतः मान्सून जून महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये परतीचा प्रवास सुरू होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून पाऊस थांबतो. पण यावेळी मान्सून लवकर परतण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...

इंस्टाग्रामची चॅटींग ११ तोळ्यांला भोवली! मेकॅनिक रेहानने नेमकं काय केलं? अहमदनगर मधील घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार? तुमची रास काय? वाचा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा...