spot_img
अहमदनगर..तात्काळ अंमलबजावणी करा! महानगरपालिका कामगार युनियनने सुरु केले उपोषण; नेमक्या मागण्या...

..तात्काळ अंमलबजावणी करा! महानगरपालिका कामगार युनियनने सुरु केले उपोषण; नेमक्या मागण्या काय? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून यासाठी युनियनच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून विविध आंदोलने केली मागील वर्षी नगर ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला त्यानंतर सरकारने पत्र देऊन बैठकीचे निमंत्रण दिले मात्र अजून पर्यंत सातवा वेतन आयोगाचा निर्णय सरकारने घेतला नाही राज्यातील (ड) वर्ग महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला मात्र अहमदनगर पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी आज अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास महापालिकेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिला.

राज्य सरकारने अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी मनपा प्रशासकीय कार्यालयासमोर युनियनच्या वतीने बेमुदत अमरून उपोषण सुरू केले आहे यावेळी उपोषनकर्ते अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर, तसेच सचिव आनंद वायकर, अनंत लोखंडे, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड़ , सागर सालुंके, अजय सौदे, प्रफुल लोंढे, अजित तारु, अंतवन क्षेत्रे, विजय कोतकर, बाळासाहेब व्यापारी, अकील सय्यद, सखाराम पवार, महादेव कोतकर, अमोल लहारे, दिपक मोहिते, नागनाथ पवले, वसंत थोरात, अनवर शेख, सुनील चाफे, मेहेर लहारे, वैभव जोशी, परीक्षित बिडकर, गणेश लयचेट्टी तसेच महापालिकेतील पुरुष व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने आदी उपस्तित होते.

आनंद वायकर म्हणाले की अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा सकारात्मक प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला मात्र सरकारने अजून पर्यंत निर्णय घेतला नाही आमचे आंदोलन हे महापालिकेच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधात आहे तरी सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे जेणेकरून कर्मचाऱ्यांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी नगरकरांना वेठीस धरण्याचा उद्देश नसून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे तितकेच गरजेचे आहे कारण ते नगरकरांना मूलभूत सुविधां रात्रंदिवस सेवा देत असतात त्यांचे प्रश्न देखील मार्गी लागणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आज मनपा मुख्य कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत अमरण उपोषण सुरू केले यामध्ये मी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, बाबासाहेब राशिनकर, हे बेमुदत उपोषनाला बसणार असून याला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे अशी माहिती जितेंद्र सर यांनी दिली

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Accident News: भीषण अपघात चार ठार! कुठे घडली घटना?

Accident News:  बीड जिल्ह्यातील बर्दापूर फाट्यावर लातूर-बीड महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला....

अहमदनगर महायुतीत नवा ट्विस्ट? नगरच्या जागेवर भाजप पदाधिकार्यांनी ठोकला दावा! बैठकीत महत्वाचा ठराव..,वाचा सविस्तर

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगरच्या जागेवरून महायुतीच्या गोट्यात सध्या तिढा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले...

Ahmednagar Crime News: विहिरीत उडी घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या! घटनास्थळी दोन चिठ्ठ्या घावल्या…कुठे घडली घटना?

Ahmednagar Crime News: दोन्ही हाताला तसेच गळ्याला दोरी बांधून ८० फूट विहिरीतील पाण्यात एका...

Bigg Boss Marathi: संग्राम चौगुले अवघ्या १४ दिवसात ‘बिग बॉस’ च्या घराबाहेर, कारण आलं समोर..

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी' आता अंतिम टप्प्यात आहे, दोन आठवड्यापूर्वी आलेला...