spot_img
महाराष्ट्रकाँग्रेसचा लढवय्या शिलेदार हरपला' ; खासदार वसंत चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन

काँग्रेसचा लढवय्या शिलेदार हरपला’ ; खासदार वसंत चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन

spot_img

Congress MP Vasant Chavan: नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी हैदराबादमधील किम्स रुग्णालयात आज पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. वसंत चव्हाण यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने खराब होत असल्यामुळे त्यांना नांदेड येथील रुग्णालयातून हैदराबाद येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक निष्ठावान नेता गमावला आहे.

वसंत चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सरपंच म्हणून सुरूवात केली. १९७८ मध्ये त्यांनी नायगाव या गावात सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद आणि राज्य विधान परिषदेवर कार्यरत राहून राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून येत त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारला होता.

सर्वात उल्लेखनीय म्हणजे, वसंत चव्हाण २०२४ मध्ये सत्तरीच्या वयात लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन काँग्रेसचे प्रतिनिधी ठरले. त्यांच्या निधनामुळे नांदेड आणि काँग्रेसमध्ये एक मोठा रिक्तपणा निर्माण झाला आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना, समर्थकांना आणि काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कामगिरीला सर्व स्तरांवरून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

लढवय्या नेता हरपला : बाळासाहेब थोरात
“काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. काँग्रेस पक्षाने एक लढवय्या नेता आणि आपण एक सहकारी गमावला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी नांदेड जिल्ह्यात काँग्रेस विचार टिकवून ठेवला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही सर्वजण चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Accident: भीषण अपघात चार ठार कुठे घडली घटना?

Accident: बीड जिल्ह्यातील बर्दापूर फाट्यावर लातूर-बीड महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या...

अहमदनगर महायुतीत नवा ट्विस्ट? नगरच्या जागेवर भाजप पदाधिकार्यांनी ठोकला दावा! बैठकीत महत्वाचा ठराव..,वाचा सविस्तर

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगरच्या जागेवरून महायुतीच्या गोट्यात सध्या तिढा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले...

Ahmednagar Crime News: विहिरीत उडी घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या! घटनास्थळी दोन चिठ्ठ्या घावल्या…कुठे घडली घटना?

Ahmednagar Crime News: दोन्ही हाताला तसेच गळ्याला दोरी बांधून ८० फूट विहिरीतील पाण्यात एका...

Bigg Boss Marathi: संग्राम चौगुले अवघ्या १४ दिवसात ‘बिग बॉस’ च्या घराबाहेर, कारण आलं समोर..

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी' आता अंतिम टप्प्यात आहे, दोन आठवड्यापूर्वी आलेला...