spot_img
महाराष्ट्रMaharashtra Politics : 'राज ठाकरेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप’

Maharashtra Politics : ‘राज ठाकरेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप’

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद सिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. महायुती सरकारकडून ‘लाडकी बहीण योजने’ची महिलांना माहिती देणे सुरु आहे. तर प्रत्येक पक्ष आपली रणनीती अधिक धारदार करत आहे. सर्वच पक्षातील नेते आता राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करतांना दिसत आहे.

अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. राज ठाकरे यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणामागे शरद पवार कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील जातीयवाद आणि फोडाफोडीचे राजकारण याला फक्त शरद पवार कारणीभूत आहे. पुलोद पसून याला सुरवात झाली. 91 मध्ये शिवसेना फोडली, भुजबळ, नारायण राणे यांना फोडले. हे राजकारण शरद पवार यांनी सुरू केले, जातीचे विष पवार यांनी पेरले. या सर्व गोष्टी राष्ट्रवादीच्य जन्मानंतर सुरू झाला, यापूर्वी महाराष्ट्र्र हा असा कधीच नव्हता, असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

ते पुढे म्हणाले,’प्रत्येकाला निवडणुकीत उभं राहायचे आहे. आमच्यासाठी पोषक वातावरण आहे. लोक मागील पाच वर्षात जे झाले ते कंटाळले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पध्दतीने मतदान झाले, हे मतदान समजून घेतलं पाहिजे. या देशात एक गठ्ठा मुस्लिम समाजाने मोदी शहांविरोधात मतदान केले. भाजपने 400 पार संविधान बदलणार असे वक्तव्य त्यांच्याच लोकांनी केल्याने काही लोकांनी मोदी शाह विरोधात मतदान केले. असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे विदर्भातील प्रत्येक भागात जात आहे. आज राज ठाकरे नागपूरमध्ये असून जिल्ह्यातील 12 विधानसभा जागेचा ते आढावा घेणार आहेत. नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...