spot_img
ब्रेकिंगविधानसभेचा प्लान फिस्कटला! 29 ऑगस्टची बैठक स्थगित; मनोज जरांगे पाटील नेमकं काय...

विधानसभेचा प्लान फिस्कटला! 29 ऑगस्टची बैठक स्थगित; मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? पहा

spot_img

Manoj Jarange Patil: सरकारने आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करणारे मनोज जरांगेंनी अचानक आपली रणनीती बदलली आहे. अंतरवाली सराटी येथे होणारी (ता. 29) रोजीची नियोजित बैठक स्थगित करण्यात आली आहे.

सरकारने विधानसभेच्या निवडणुका चार महिने पुढे ढकलल्या आहेत. राज्यात कोणती आपत्ती नाही किंवा मोठे असे कारण नाही, तरीही काही कारण नसताना विधानसभा निवडणूक चार महिने पुढे ढकल्यामुळे विधानसभेच्या रणनीतीमध्ये बदल केल्याची माहिती मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनोज जरांगे म्हणाले, अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज, बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार, लाठी हल्ला, राज्यात मराठा समाज, धनगर समाजाचे आरक्षणाकरिता होत असलेले आंदोलन, मोठे समाज सत्ताधारी सरकारच्या विरोधात आहेत. या घटनांची सत्ताधारी सरकारला भीती वाटत आहे, त्यामुळे सरकारने भीतीपोटी आणि निवडणुकीमध्ये फटका बसणार या कारणाने निवडणूक पुढे ढकलली आहे.

अंतरवाली सराटीत ता. 29 रोजी विधानसभा निवडणूक लढ्याची का समोरचे पाडायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. परंतु, सरकार आमच्या निर्णयाची वाट पाहत होते. आमची रणनिती त्यांना कळू नये, त्यांचे डाव यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही पण निवडणूक लांबली असल्याने ता. 29 रोजी आमचा निर्णय जाहीर करणार नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...