spot_img
अहमदनगर१५ वर्षांनंतर प्रथमच कर्मचाऱ्याच्या हस्ते झेंडावंदन;'यांना' मिळाली प्रामाणिकपणाची पावती

१५ वर्षांनंतर प्रथमच कर्मचाऱ्याच्या हस्ते झेंडावंदन;’यांना’ मिळाली प्रामाणिकपणाची पावती

spot_img

सुपा । नगर सहयाद्री:-
केंद्र शासनाच्या वतीने “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येत असून १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट रोजी शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सोसायटी कार्यालय यासह प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलात फडकू लागला आहे.हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आज १४ ऑगस्ट रोजी पारनेर तालुक्यातील कडूस ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सामाजिक कार्य करण्यासाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व व ग्रामपंचायत मधील प्रत्येक काम मन लाऊन व प्रामाणिक पणे करणारे ग्रामपंचायत कर्मचारी पापुभाई शेख यांना आज ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला.

१५ ऑगस्ट २६ जानेवारी रोजी दरवर्षी सरपंच, उपसरपंच यांना हा मान मिळतो. फक्त त्यांनीच झेंडा वंदन करायचे अशी ग्रामीण भागात प्रथा आहे. मात्र कडूसमध्ये या सर्व प्रथेला फाटा देत एका कर्मचाऱ्याच्या कामाची पोहोच पावती मिळाली आहे.

प्रामाणिक पणे काम करणाऱ्याला झेंडावंदन करण्याचा मान देण्यात आला. १५ वर्षात प्रथमच कडुस गावमध्ये व तालुक्यामध्ये कर्मचारी यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा मान दिला असल्याचे सरपंच मनोज मुंगसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...