spot_img
ब्रेकिंगविधानसभा निवडणुकीचा सर्व्हे आला; अब की बार, कोणाचे सरकार! पहा...

विधानसभा निवडणुकीचा सर्व्हे आला; अब की बार, कोणाचे सरकार! पहा…

spot_img

तीन विभागांत महायुती वरचढ ठरणार
मुंबई | नगर सह्याद्री

लोकसभा निवडणुकीत राज्यात ३१ जागा जिंकणार्‍या महाविकास आघाडीने आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करुन राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीने राज्यात सर्वेक्षण करुन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार महाविकास आघाडीला विधानसभेला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी १४५ जागा जिंकणं गरजेेचे आहे.

विधानसभा निवडणुकीची रणनीती आखताना महाविकास आघाडीने राज्याची विभागणी सात भागांमध्ये केली आहे. नागपूर, अमरावती भागात काँग्रेसची कामगिरी चांगली होईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यातही आघाडीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. तिथे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही शरद पवारांची राष्ट्रवादी चांगली कामगिरी करेल. सर्वच प्रमुख पक्ष विविध भागांमध्ये त्यांची जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास शरद पवार गटातील माजी कॅबिनेट मंत्र्याने व्यक्त केला.

चार विभागांमध्ये महाविकास आघाडी वरचढ ठरण्याची शयता असताना मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात महायुती पुढे राहण्याचा अंदाज आहे. या भागात भाजप, शिंदेसेना आण अजित पवार गटाची चांगली ताकद आहे. लोकसभेला कोकण पट्ट्यात आमची कामगिरी चांगली झाली नाही. आता विधानसभेला चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आहे. मुंबईतही भाजप, शिंदेसेनेचे मोठं आव्हान आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेला काँग्रेसला काही जागा मिळाल्या. पण पक्ष अजूनही तिथे कमजोर आहे. कच्चे दुवे ओळखून त्यावर काम करण्यासाठी आता हाती फारच कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेत्याने सद्यस्थिती सांगितली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...