spot_img
अहमदनगरशेतकर्‍यांची वाटण्यात कोट्यावधींची जुगार!

शेतकर्‍यांची वाटण्यात कोट्यावधींची जुगार!

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री:-
पारनेर तालुयासह परिसरात वाटाण्याचे पीक शेतकरी घेत असतात. हा वटाणा सध्या विक्रीला येत असून काही दिवसापूर्वी दीडशे पार असलेले बाजार ६० ते ७० वर येऊन पोहोचला आहे. आवक वाढली असली तरी मालाची गुणवत्ता नसल्याने बाजार भाव कमी झाल्याचे व्यापार्‍यांकडून बोलले जात आहे. तर शेतकर्‍यांनी वाटण्यात कोट्यावधीची जुगार खेळून हाती असलेले भांडवल ही मातीत घातले.

या वर्षी शेतकर्‍यांनी घातलेले भांडवलही निघाले नाही त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे जवळ असलेले पैसे बियाण्यात घातले. तालुयातील शेतकर्‍यांनी सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयेची बियाणे यावर्षी शेतात पेरले. त्यातून आर्थिक फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे न होता उलट त्यासाठीचा दुपटीने खर्च शेतकर्‍यांचा झाला. यामुळे जवळपास ७० ते ८० कोटी रुपयांचा तोटा शेतकर्‍यांना झाला. त्यामुळे कोट्यावधीचा जुगार तालुयातील शेतकर्‍यांनी खेळला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने तालुयातील शेतकरी वाटाणा या पिकाकडे वळले. शेतकर्‍याला पुढील पिकासाठी आर्थिक दृष्ट्या भांडवल वाटाणामूग या पिकातून होत असते. मात्र यावर्षी खराब हवामान यामुळे उत्पादन क्षमता घटली आहे.तालुयातील पारनेर कान्हूरपठार हे वाटाणा पिकासाठी मुख्य आगार मानले जाते. यासह तालुयात मोठ्या प्रमाणात वाटाण्याची पेरणी झाल्या पारनेर परिसरात बुगेवाडी सिद्धेश्वरवाडी तराळवाडी हंगे वडनेर हवेली गोरेगाव डिकसळ आदी भागातील वाटाणा सध्या बाजारात येत आहे. चाळीस किलोची बॅग ७ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत शेतकर्‍यांनी खरेदी केली. एका वटाण्याच्या गोणीला उत्पादन खर्च १५ ते २० हजार रुपये पर्यंत आला. मात्र त्या तुलनेत बाजार भाव ५० ते ६० रुपये त्यादरम्यानच आले आहेत. सततच्या ढगाळ हवामानामुळे पिकावर बुरशी व रोगराईचा प्रादुर्भाव आहे. त्यामूळे या मोसमात उत्पादन कमी निघत आहे.

गुणवत्ता नसल्याने भाव पडले
पारनेर तालुयातील वटाणा हा खाण्यासाठी चवदार असल्याने या वाटाण्याला बडोदा अहमदाबाद सुरत, मुंबई, जळगाव, पुणे येथे मागणी आहे. मात्र यावर्षी सतत ढगाळ वातावरण व रोगराईमुळे वाटण्याला गुणवत्ता नसल्याने बाजार कमी झाले. तसेच उत्पादनही कमी असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला तर मागणी असूनही गुणवत्ता व तेवढा पुरवठा होत नसल्याने वटाणा बाजारात मंदी आहे.
-अनिल बढे (वटाणा व्यापारी)

उत्पादन खर्च देखील मिळत नाही.
वाटाण्याची ४० किलोची गोणी पेरली तिला ६० उत्पादन मिळाले. त्यासाठीचा उत्पादन खर्च पंधरा ते वीस हजार आला. त्या गोणीचे ५ हजार रुपये झाले. पंधरा हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती तालुयातील सर्व शेतकर्‍यांची आहे. त्यामुळे वाटाणा उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान मोठे झाले असून उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या.
-सुरेश शिंदे (वटाणा उत्पादक शेतकरी)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...