spot_img
अहमदनगरभरधाव ट्रकने 'इतक्या' वाहनांना उडविले; अहमदनगर मधील दुर्घटना

भरधाव ट्रकने ‘इतक्या’ वाहनांना उडविले; अहमदनगर मधील दुर्घटना

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील पांढरीपूल घाटातील तीव्र उतारावरून भरधाव जाणाऱ्या ट्रकने सहा वाहनांना उडविले. अपघातात २० जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. २९) घडली. पांढरीपूल घाटातील तीव्र उतारावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच १६ सीसी ४३४३) पांढरी पूल येथे समोर जात असलेल्या चार कार, एक मालवाहतूक टेम्पो व एक दुचाकीस धडक दिली.

अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र जखमींचा आरडाओरडा सुरू होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. धडक एवढ्या जोराची होती की दोन कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने फेकल्या गेल्या. अपघातात सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात काही गंभीर जखमी झाले आहेत, तर काहींना किरकोळ मार लागला आहे.

घाटातील तीव्र उतारावर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक दोन किलोमीटर अंतरावरील हॉटेलवर पार्किंग करून फरार झाला. घटनास्थळी सोनई पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींवर नगर येथील खासगी तसेच काहींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Politics News: राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आंदोलन छेडणार! कारण काय? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics News; सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्तबाग महाल...

Ahmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाता लुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने...

Pitru Paksha: पितृपक्षात श्राद्ध विधी करणे गरजेचा का आहे? महाभारताच्या १३ व्या अध्यायात नेमकं काय? जाणून घ्या

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण...

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना...