spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल! आरोपींना मिळणार नाही जामीन, नेमकं घडलं...

अहमदनगरमध्ये नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल! आरोपींना मिळणार नाही जामीन, नेमकं घडलं काय? पहा

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
देशामध्ये सोमवारपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले. नव्या कायद्यानुसार अहमदनगरमध्ये रस्त्यात अडवून लुटीचा पहिला गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार हा गुन्हा अजामीन पात्र आहे. त्यामुळे गुन्हेगारांना चाप बसण्यास मदत होणार आहे.

गणेश मोहन शिंदे व त्यांचा मित्र कामरगाव शिवारातून जात असताना पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून ३ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नव्या कायद्यानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

देशात सोमवारपासून ३ नवीन फौजदारी कायदे लागू झाले. संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) ३(५), आर्म अॅक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...